Sunday, September 19, 2010

शिवरायाचा मृत्यु कि खून ?

संभाजीराजे आणि सोयराबाई यांचे नातेसंबंध :-


१. सत्ताप्राप्तीसाठी शिवरायांचे कुटुंबात कोणत्याही प्रकारचा संघर्ष नव्हता. सोयराबाईनी संभाजीराजांना शेवटपर्यंत स्व:पुत्रा प्रमाणे सांभाळले. तर संभाजीराजे सोयराबाईना नेहमी " निर्मल मनाची आई " असे म्हणत.


२. सोयराबाई व शंभूराजे यांचे भांडण लावायचा प्रयत्न ब्राह्मण मंत्र्यांनी केला. पण त्यात त्यांना यश आहे नाही. या उलट संभाजीराज्यांनी स्वराज्याचे वाटणीस विरोध केला.


३. राजाराम यांना राजसाबाई यांचे पोटी पुत्र रत्न झाले . तेव्हा राजाराम यांनी पुत्राचे नाव संभाजी असे ठेवले ( १६९७ ) जर संभाजी व राजाराम यानमध्ये संघर्ष असता तर राजाराम यांनी मुलाचे नाव संभाजी असे ठेवले असते का ? 



शिवरायांचा खून  का व  कसा झाला :--

 हजारो वर्षांची ब्राह्मनी दादागिरी शिवाजीराजे व संभाजीराजे यांनी संपवली त्यामुळे ब्राह्मण आतून प्रचंड चिडले. म्हणून त्यांनी राज्यांचे कुटुंबात भांडण लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

अपयश आले तरी मोरोपंत, अण्णाजी, राहुजी सोमनाथ थांबले नाहीत. शिवरायांना संपवायचेच हा पक्का निश्चय त्यांनी केला होता. आण्णाजी दत्तो  रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला थांबला होता. गडावर राहुजी सोमनाथ हा ब्राह्मण अधिकारी होता. रायगडाची संपूर्ण  नाकाबंदी करण्यात आली. कसल्याही प्रकारचा सुगावा लागणार नाही याची दक्षता या तिघांनी घेतली. म्हणून या कटाचा संशय येऊ नये यासाठी मोरोपंत आणि अण्णाजी दत्तो घटनास्थळा पासून दूर थांबले होते. हत्त्या करण्याचा कट रचणारे, प्रवृत्त करणारे जवळ थांबत नसतात. या प्रसंगी राज्यातील अत्यंत महत्वाची माणसे गडावर नव्हती. संभाजीराजे पन्हाळा गडावर होते. सेनापती हंबीरराव माहिते हे तळबीड या ठिकाणी होते. ते राजगड    पासून २५० किलोमीटर आहे. शिवाजी महाराज यांचे कुटुंबातील सर्व नातेवाईक हे पाचाडला होते. असा स्पष्ट उल्लेख शिवभारतमध्ये आहे. (  संदर्भ :- वा.सी.बेंद्रे लिखित श्री. छ. संभाजी महाराज )
 
 तीन एप्रिलचा दिवस उजाडला तेव्हा शिवरायांचे भोवती ब्राहामानांचेच वलय होते. राहुजी सोमनाथने गडावरचे सर्व दरवाजे बंद केले. गडाची सर्व सूत्रे सोमनाथच्या ताब्यात होती. या सार्या परिस्थितीचा फायदा घेऊन  शिवरायांवर विषप्रयोग झाला. संभाजीराजे व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना राज्यांचे खुनाची माहिती समजणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. राज्यांचा अंत्यविधी हा घाई घाईत उरकण्यात आला.


दहा  वर्षाच्या राजारामला सिंहासनावर बसउन ब्राह्मण मंत्री सत्ता ताब्यात घेउ इच्छित होते. म्हणून त्यांनी दहा वर्षाच्या राजारामाच्या राज्याभिषेकाची बातमी फुटू न देता राज्याभिषेक उरकला. शिवरायांचा खून व राजाराम यांचा झालेला राज्याभिषेक चोरून लपउन केला गेला. हि बातमी रायगडावरून फुटणार नाही याची दखल घेतली गेली. लगेच ब्राह्माण मंत्र्यांनी संभाजीराजे यांना पकडण्याचे ( अटक) करण्याचे आदेशपत्र हंबीरराव मोहिते यांना दिले.... पण हंबीरराव यांना शिवरायांनी खाजगीत संभाजीला छत्रपती करा असे सांगितले होते. राजाराम हा दहा वर्षाचा आहे त्याला राजाकरणे हे स्वराज्य ब्राह्मण मंत्र्यांचे हातात देणे होईल अशी सूचना शिवरायांनी पूर्वीच " राजारामाचे सख्खे मामा सेनापती हंबीरराव मोहिते " यांना केली होती. हंबीरराव यांना ब्राह्माण मंत्र्यांचे पत्रं मिळताच त्यांनी संभाजीराजे यांना त्याची माहिती कळवली.

वरील प्रसंग सिद्ध करतो कि सोयराबाई यांचा सख्खा भाऊ हा स्वतःच्या भाच्याला छत्रपती करायची संधी डावलून स्वराज्याचे हित पाहतो. पहा नीट पहा विचार करा सोयराबाईया संभाजी विरोधक नव्हत्या याचा हा पुरावा नव्हे काय ? तरीही हा खून सोयराबाई यांनी केला अशी अफवा  ब्राह्मणी इतिहासकारांनी नंतर उठवली.
 
जेव्हा शिवरायांचा खून झाला तेव्हा राज्यांचे वय हे अवघे ५०  वर्ष होते. राज्यांना कोणताही असाध्य रोग नव्हता. ते प्रधीर्ग आजारी नव्हते. राज्यांची प्रकृती निरोगी होती. वयाचे ५० व्या वर्षी राज्यांना अनैसर्गिक मृत्त्यू येणे कदापीही शक्य नाही.




शिवरायांच्या मृत्त्यू बाबद संशय निर्माण करणाऱ्या काही बाबी :--
१. शिवरायांचे धर्म परिवर्तनाचे कार्य.
२. शिवरायांनी  ब्राह्मणी वर्चस्वाला दिलेला शह.
३. रायगडावरील ब्राह्मण मंत्र्यांचा अंतर्गत विरोध.
४. तीन एप्रिलचे गडावरील संशयास्पद वातावरण.
५. शिवरायांचा घाई घाईत उरकण्यात आलेला अंत्यविधी.
६. पराक्रमी, विद्वान,चारित्र्यसंपन्न, जेष्ठपुत्र संभाजीराजे यांना धोका देऊन कोणतीही चूक नसताना कैद करायचे आदेश देऊन.... दहा वर्षाच्या कनिष्ठ राजारामला घाई घाईत छत्रपती करण्यामागचा ब्राह्माण मंत्र्यांचा हेतू काय असावा ?
७. शिवरायांच्याखुनाची, राजारामाच्या राज्याभिषेकाची, माहिती गोपनीय  ठेवण्या माघे ब्राह्माण मंत्र्यांचा  काय हेतू होता ?
८. संभाजी महाराजांचे सांत्वन  करण्यापेक्षा त्यांना अटक करायला गेलेले ब्राह्मणमंत्री यांचा हेऊ काय होता ?
9. या सार्या प्रकारा नंतर संभाजीराजे यांनी सोयराबाई यांना मान दिला, गौरवले व राजाराम महाराज यांना प्रेमाने वागवले....... तर ब्राह्माण मंत्री यांना कैद केले व पुढे त्यांना हातीचे पायाखाली देऊन ठार केले. हे काय दर्शवते


               संभाजी महाराज यांना अटक करा व आम्हाला वाटेत भेटा असे आदेश ब्राह्माण मंत्र्यांनी हंबीरराव मोहिते यांना दिले होते .पण संभाजी महाराज यांना कपटाने   कैद करायला निघालेल्या मंत्र्यांना ( मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत..) हंबीरराव यांनी वाटेतच अटक केले ! त्यानंतर संभाजीराजे हे रायगडावर आले त्यांनी सर्व मातांचे सांत्वन केले.


सोयराबाई या निर्दोष होत्या हे सिद्ध करणारा एक भक्कम पुरावा म्हणजे  संभाजीराजे २४ ऑगस्ट १६८० रोजी म्हणतात कि ' सोयराबाई या स्फटिका सारख्या निर्मल मनाच्या आहेत'. याचा अर्थ सोयराबाई या निर्दोष तर होत्याच पण त्या संभाजीराजे यांना आदर स्थानी होत्याकुमंत्र्यांनीच सोयराबाई यांना संभाजी विरोधात भडकवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. [संधर्भ छ. संभाजी (पान २२१ ) वा. सी बेंद्रे.]

  आता आपण शिवरायांचे मृत्युबाबत देशी आणि परदेशी साधनांचा विचार करू :--



पुढील संदर्भ साधनांची चिकित्सा करताना त्या साधनांचा काळ व कर्ता याचा विचार केलेला आहे. मराठी आणि संस्कृत साधनांचे लेखक हे ब्राह्मण या एकाच जातीचे असल्याने सत्यशोधनात अडचणी येतात. तरी देखील अपराधीपणाची जाणीव त्या साधनात सापडते.




सुरवातीला आपण अमराठी साधने पाहूयात ......


१. इंग्रजांचे पत्र " शिवाजी महाराज यांचा मृत्यू रक्तातीसाराने झाला. "
२. पारसी कागदपत्र ( मासिरे आलमसिगरी - साकीमुस्तेखान ) " शिवाजी हे घोड्यावरून उतरले त्यांना अतिउष्णतेमुळे दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला "
३. निकोलोमनुची ( असे होते मोगल ) - " शिवाजीराजे यांना रक्ताच्या उलट्या होऊन मरण आले "
४. दाघ रजिस्टर ( डच कागदपत्र - १६८० (पृष्ठ ७२४.२९) संदर्भ परयीच्या दृष्ठी. ) - " राज्यांवर विषप्रयोग केला असावा "



                   शिवाजीराज्यांनी राजारामाचा विवाह १५ मार्च १६८० रोजी प्रतापराव गुजर यांचे मुलीशी लाऊन दिला आणि अवघ्या १८ दिवसात शिवाजीराजे यांचा खून झाला. शिवाजीराजे रक्ताच्या उलट्या होऊन मरण पावले हे सारे जाणतात पण त्यांना रक्ताच्या उलट्या का झाल्या ? हे मात्र सारेच जाणत नव्हते कारण ब्राह्माण मंत्र्यांनी रायगडावरून वाराही बाहेर जाणार नाही याप्रकारे बंदोबस्त केला होता.






आता आपण मराठी -संस्कृत साधने पाहू :----


१. शिवदिग्विजय - " सोयराबाईंकडून राज्यांना विषप्रयोग झाला "
२. चिटणीस बखर - " सोयराबाईवरच आरोप ठेवते "
३. जेधे शकावली - " चैत्र शुद्ध शनिवार दिवसा दोन प्रहरी रायगडावर शिवरायांचे निधन झाले हंबीरराव मोहिते यांनी मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत यांना कैद केले."



चिटणीस बखर,शिवदिग्विजय या १८१८ सालच्या असल्याने समकालीन नाहीत. पण त्या विषप्रयोग झाल्याचे बोलतात. ब्राह्माण मंत्र्यांनी विषप्रयोग केला पण सोयराबाई यांच्या नावाने अफवा पसरवली. हे वरील साधनांवरून लक्षात येते.


जेधे शकावली हि दैनंदिनी असल्याने स्पष्टीकरण नाही पण त्यात निधनानंतर लगेच मंत्र्यांना अटक केल्याचे स्पष्ट होत आहे. मंत्र्यांनी खून केला म्हणून त्यांना अटक केली असा स्पष्ट अर्थ निघतो.
 
बहुजन सामाज्याची दिशाभूल करण्यासाठी नंतर काही ब्राह्माण इतिहासकरांनी शिवरायांचा मृत्यू हा " गुडघी रोगामुळे " झाला अशी अफवा पसरवली. (पण मित्रहो जगाच्या इतिहासात पूर्वी आणि आजही गुडघीरोग कोणालाही झाल्याचे उदाहरण नाही..) तर काही इतिहासकारांनी शिवरायांचा खून हा सोयराबाई यांनी केला असा कुप्रचार सुरु केला.




याचा स्पष्ट अर्थ काय निघतो ब्राह्माण हे अफवा पसरवण्यात, दिशाभूल करण्यात, कपटकारस्थानात, खून पचवण्यात जगात एक नंबर आहेत.


राज्यांचा खून पचावायासाठी ब्राह्मण कंपूने अनेक अफवा पसरवल्या. जनतेला खरे गुन्हेगार समजू नयेत खरे आरोपी सुटावेत यासाठी आजही ब्राह्माण खोटा प्रचार, दिशाभूल करत असतात.


शिवरायांचा खून पचउन स्वराज्य हस्तगत करायचा ब्राह्माण मंत्र्यांचा डाव होता त्यासाठी त्यांनी राजाराम यांचा राज्यभिषेक घाई घाईत उरकला.


कारण राजाराम हे १० वर्षाचे बालक होते. राजारामला नामधारी राजा करायचे व राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातात घ्यायची असा ब्राह्मण मंत्र्यांचा डाव होता. तसेच संभाजीराजे हे हुशार, धाडसी,पराक्रमी, होते म्हणून संभाजीराजे यांना अटक करायला मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत हे पन्हाळागडाकडे निघाले पण वाटेतच या कपटी, स्वराज्यद्रोही, नरपशूना.... स्वराज्यप्रेमी, शिवभक्त, राजाराम यांचे सख्खे मामा हंबीरराव मोहिते यांनी अटक केली आणि संभाजीराजे यांचा रायगडावर अभीषेक केला. !






तात्पर्य :-

                  विषप्रयोग झाला हे सारे जाणतात. काही ब्राह्मणी विचारांना बळी पडून सोयराबाई ही यात सामील होत्या असे समजतात. पण त्याच वेळी शंभूराज्यांनी सोयराबाई यांना कधीच अटकही केले नाही व कोणताही त्रास दिला नाही उलट खुणानंतर ५-६ महिन्यांनी संभाजीयांनी सोयराबाई यांना गौरवले त्याचा सन्मान केला  ! याचा वर पुरावा दिलेला आहे. म्हणजेच सोयराबाई या निर्दोष होत्या हे कोणीही खरा शिवप्रेमी कबुल करेल. म्हणजेच शिवरायांचा खून हा केवळ स्वराज्य बळकावण्यासाठी ब्राह्माण मंत्र्यांनी केलेला ब्राह्मणीकावा होता हे सिद्ध होते.






---------------------------------------------------------------------------------------





तरीही काही लोक खालील शंका उपस्थित करू शकतात :------>



 १. शिवरायांवर विष प्रयोग झाला का ?



------> परिस्थिती तशीच आहे.


सुरवातीला आपण अमराठी साधने पाहूयात ......
१. इंग्रजांचे पत्र " शिवाजी महाराज यांचा मृत्यू रक्तातीसाराने झाला. "
२. पारसी कागद पत्र ( मासिरे आलमसिगरी - साकीमुस्तेखान ) " शिवाजी हे घोड्या वरून उतरले त्यांना अतिउश्नते मुळे दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला "
३. निकोलो मनुची ( असे होते मोगल ) - " शिवाजीराजे यांना रक्ताच्या उलट्या होऊन मरण आले "
४. दाघ रजिस्टर ( डच कागदपत्र - १६८० (पृष्ठ ७२४.२९) संधर्भ परयीच्या दृष्ठी. ) - " राज्यांवर विष प्रयोग केला असावा "


वरील अमराठी साहित्य काय सांगते ?
शिवरायांना रक्ताच्या उलट्या झाल्या. हे कोणीही टाळू शकत नाही. शिवाजीराज्यांनी राजारामाचा विवाह १५ मार्च १६८० रोजी प्रतापराव गुजर यांचे मुलीशी लाऊन  दिला  आणि अवघ्या १८ दिवसात शिवाजीराजे यांचा मृत्यू झाला तोही रक्ताच्या उलट्या होऊन ! शिवाजीराजे रक्ताच्या उलट्या होऊन मरण पावले हे सारे जाणतात................. पण त्यांना रक्ताच्या उलट्या का झाल्या ? याचे उत्तर ब्राह्मणीसाहित्य त्यांचे भाषेत देते..
---------->


१. शिवदिग्विजय - " सोयराबाईंकडून राज्यांना विषप्रयोग झाला "
२. चिटणीस बखर - " सोयराबाईवरच आरोप ठेवते "


निष्कर्ष काय निघतो :--
१. कि सारे म्हणतात रक्ताचा उलट्या झाल्या.
२. दाघ रजिस्टर म्हणते विषप्रयोग झाला.
३. ब्राह्मणी साहित्य हि स्वीकारते कि विषप्रयोग झाला ! पण तो सोयराबाई यांनी केला !!


यातील कोणाकडे काहीही पुरावा नाही म्हणू हा गोंधळ होत आहे.

                   पण हे उघड आहे कि राजाराम यांचे लग्न झाले आणि १८ दिवसात शिवाजी वारले. लग्ना वेळी ते तंदुरुस्थ होते. कोणताही असाध्य रोग नव्हता. मग अचानक रक्ताच्या उलट्या का झाल्या ? या प्रश्नाचे उत्तर हेच आहे कि विषप्रयोग झाला.




2. मग नवीन प्रश्न निर्माण होतो कि तो कोणी केला ?

            त्यासाठी आधी रायगडावर त्याप्रसंगा आधी परिस्थिती कशी होती हे पाहावे लागेल
रायगडावर शिवरायांचे घरात गृहकलश सुरु होता !! शिवाजी महाराज हे कोणी साधारण व्यक्ती नव्हते. महाराजांसारखे कुशल पारखी यांचे घरात गृहकलश !
          ज्यांनी संपूर्ण भारतीय मूलनिवासी जनतेला एक जुठ केले , अनेक कुटुंबातील वाद आपल्या दरबारात योग्य न्यायाने मिटवले त्या महाराजांचे घरात गृहकलश !!! छे छे हे मनाला अजिबात पटत नाही ... ज्यांनी अफजलखानसारख्या महाकाय श्वापदाच्या आणि औरंगजेबासारख्या कुशाग्र बुद्धी असणाऱ्या बादशाच्या हातावर तुरी दिल्या. त्या महाराजांना आपल्याच घरातील वादावर हतबल व्हावे  लागले हे मनाला पटत नाही. पण काय करणार भावना या भावनेच्या जागी राहतात आणि वास्तव हे वास्तव असते...... आणि वास्तव हेच आहे कि महाराज यांचे घरात गृहकलश होता !


गृह कलश होता हे वास्तव जड अन्तःकारणाने स्वीकारले तरी काही नवीन प्रश्न निर्माण होतात.गृहकलश काय होता ? त्याचे कारण काय ?
सोयराबाई यांना संभाजीराजे हे छत्रपती होणे पसंत नव्हते ! का ? तर त्यांचा १० वर्षाचा मुलगा त्यांना तेथे हवा होता !! पण राज्याभिषेकावेळी तर असे काही झाले नाही........ मग आताच का असे व्हावे  कारण सोयराबाई यांचे मनात कोणीतरी विष कालवले..... मग हे विष कालवणारे कोण होते ? त्यांनी असे का केले ?
              ते होते ब्राह्मणमंत्री........अण्णाजी दत्तो हे या कटाचे मुख्य सूत्रधार होते !!!! अण्णाजी दत्तो.. ज्या माणसाने एक दोन वेळा स्वराज्यसाठी तलवार हि उचलली तो अण्णाजी ! असे का वागला ?

कारण :---------->
A)संभाजी महाराज यांनी एक वेळा या आण्णाजीने केलेला भ्रष्टाचार उगडा केला होता ! त्याची बोच या अण्णाजी दत्तोच्या काळजात गेली होती.
B ) अण्णाजी दत्तोची विवाहित मुलगी हिचे संभाजी महाराज यांचे वर प्रेम होते ती त्यांचेकडे आकर्षित झाली होती. आणि त्यातून एक प्रसंगी तिने संभाजीराजे यांचे महालात जाऊन इच्छा व्यक्त केली होती. पण "पराविया नारी राखूमाई समान" या तुकोबांच्या विचारांशी नाते असल्याने व तसे संस्कार जिजाऊनी व शिवरायांनी केलेले असल्याने संभाजी महाराज यांनी तिला महालातून हाकलून दिले. त्यामुळे तिने स्वतःच्या कृतीचा पश्चाताप झाल्याने आत्महत्या केली. असे बरेच प्रसंग येथे देता येतील पण या दोन प्रसंगा वरून दत्तो का दात खाउन होता हे लक्षात येते.

           शिवरायांवरील विषप्रयोगा आधीही ब्राह्मणमंत्री यांनी बरेच वेळा शंभू महाराज यांना बदनाम करणे व संपवण्याचा प्रयत्न केला होता. सोयराबाई आधी त्यांनी शिवरायांचे मनात विष कालवायचे अनेक प्रयत्न केलेले होते.
तसेच शंभू महाराज यांना संपवण्याचे ही प्रयत्न याच मंत्री लोकांनी केले होते. सविस्तर माहितीसाठी आपण संभाजी ही कादंबरी वाचा.
             तात्पर्य.....शिवरायांचे मंत्री हे कटकारस्थानी होते व त्यांनी संभाजी महाराज जिवंत असताना ही अनेक कारस्थाणे केली आणि ते शहीद झाल्यावर कारस्थानांचा वारसा त्यांचे वंशजांनी चालू ठेवला.

आता कोणालाही वरील शंका नसावी. मराठा सामाज्याचा सर्वात मोठा प्रोब्लेम हा आहे कि आम्ही स्वतः कधी ही वाचन करत नाही ब्राह्मण सांगतात आणि आम्ही ऐकतो. आणि ब्राह्मण ही मोठे धूर्त असतात ते ही असे काही असत्य बिंबवतात कि सत्य हे बरोबर त्या उलट सापडते.......
                       वर सिद्ध होते कि ब्राह्माण मंत्री यांनी पहिल्यांदा शिवरायांचे मनात विष कळवायचा प्रयत्न केला. पण शिवराय यांचे स्वतःच्या पहिल्या मुलावर, स्वराज्याच्या भावी छत्रपतीवर प्रेम होते आणि असणार तसेच शिवराय हे दुसर्याचे ऐकणारे नव्हते , कान चुगल्याना बळी पडणारे नव्हते त्या मुळे धूर्त ब्राह्मण मंत्री यांचा हा प्रयोग फसला !


आता या मंत्री लोकांनी मोर्चा वळवला तो सोयराबाई यांकडे. सोयराबाई या सरळमार्गी,साध्या-भोळ्या,स्फटिक मनाच्या होत्या त्यांना या ब्राह्मण मंत्र्यांच्या चाणक्यानीतीचा ठाव नव्हता. त्यामुळे त्या सुरवातीला या मंत्र्यांच्या कानचुगल्याना बळी पडल्या !!!


काही वेळ शिवरायांचे कुटुंबात वाद निर्माण झाला पण त्याला हे मंत्री जबाबदार होते. यासाठी पुरावा म्हणू संभाजीराजे यांचे पत्र घ्या.


संभाजीराजांचे 24 डिसेंबर 1680चे पत्र उपलब्ध आहे. त्यात ते म्हनतात ..
."राणीचे (सोयराबाईचे) मन स्फटिकासारखे निर्मळ होते. पण कुटिल मंत्र्यांनी दुष्ट सल्ला दिला की मोठ्या मुलाला गादी मिळता कामा नये. या सल्ल्याचा प्रभाव तिच्यावर पडला. "
आता हे स्पष्ट दिसत आहे कि शिवरायांचे घरात आणि संभाजीराजे यान वरील सर्व कटकारस्थानात फक्त आणि फक्त ब्राह्मण मंत्री होते ते अनेक वर्षापासून असे डाव आखत होते. त्या मंत्री गणाचे प्रतिनिधीत्व हे अण्णाजी दत्तो करत होते.







आता पुढे प्रश्न निर्माण होतो तो काय ब्राह्मण मंत्री यांचे चाणक्यनीतीला बळी पडलेल्या सोयराबाई या विषप्रयोगात सामील होत्या ? काय त्यांना याची पुसटशी हि कल्पना होती ?


---->  नाही ते शक्य नाही कारण "राणीचे (सोयराबाईचे) मन स्फटिकासारखे निर्मळ होते." असे खुद्द शंभू राजे बोलतात. अशी स्त्री असे करणे शक्य नाही. उलट त्यांना असा कट माहित असता तर त्यांनी पुढील घटना रोकली असती हे उघड आहे.


मग राहतात ते अण्णाजी दत्तो आणि त्यांचे सहकारी. बाकी कोणावर हि संशय घेता येणे शक्य नाही.
 

3. शेवटी आणखीन एक प्रश्न ब्राह्माण भक्त करतील कि अण्णाजी दत्तो यांनी फार चुका केल्या हे कबुल पण काय ते शिवरायानवर विषप्रयोग करतील ?
---> हो ते करू शकतात.
कारण त्यांनी संभाजी महाराज यांवर विषप्रयोग केल्याचे इतिहासात दाखले आहेत पण ते फसले.
त्यांनी केलेल्या अनेक  गुन्हे शंभू महाराज यांनी माफ करून हि अण्णाजी आणि कंपूने शिवरायांचे स्वराज्य हे मोगल पुत्र अकबराला विश्वासात घेऊन वाटून घेण्याचा कट केला होता. आणि आम्ही संभाजीला संपवायला तुम्हाला मदत करतो अश्या आशयाचे पत्र हि लिहिले होते मोगल पुत्राला ! पण त्यांचे दुर्दैव मागील कटात त्यांनी हंबीरराव यांना फितावण्याचा प्रयत्न केला व हंबीरराव यांनी त्यांनाच धडा शिकवला आता त्यांनी मोगल पुत्राला स्वराज्य वाटून घेण्याचे आमिष दाखवले पण याही वेळी मोगल पुत्र तडक शंभू राज्यांना हे पत्र देऊन मोकळा झाला ! आणि या शिवद्रोह्याना हत्तीचे पाया खाली द्यावे लागले.


आता तुम्हीच विचार करा :--
१. ज्या लोकांनी शिवरायाची शेवटची इच्छा (म्हणजे शंभूराजे यांना गाडीवर बसवणे ) पूर्ण करायचे सोडून शंभूराज्यांना कैद करायचा  कट केला.२. एवडे होऊन हि शंभूराजे यांनी काही दिवस कारावास देऊन यांना मोकळे केले तर यांनी पुन्हा शंभू हत्तेचा कट केला. त्यातून सुटले
३. परत यांनी शिवरायांचे स्वराज्य मोगलाला फुकट वाटून देण्याचे पत्र दिले व शंभू महाराज यांना संपवण्याची इच्छा केली.

हे शिवरायांचे भक्त असतील का ? यांनी शिवरायांवर विष प्रयोग केला असणे शक्य नाही का ?

281 comments:

  1. सदर ब्लॉग संपूर्ण वाचला. त्यामधील मजकुरातील मुद्दे व संदर्भ, स्पष्टीकरणे आणि युक्तिवाद काळजीपूर्वक वाचल्यानंतर प्रेरणापुरुष छ. शिवाजीमहाराज यांचा खून करण्यात आल्याची खात्री पटते. तत्कालीन सर्व लेखक एका विशिष्ट जातीचे असल्याने शिवरायांच्या खुनाबाबत एकतर्फी लेखन झाले असल्याचे मानण्यास पुरेशी जागा आहे! ब्लॉगलेखकाने अभ्यासपूर्वक व परिश्रमपूर्वक हा ब्लॉग लिहिल्याचे दिसते. त्याबद्दल त्यांना धन्यवाद ! शक्य झाल्यास या विषयावर अधिक लेखन यावे असे वाटते.- प्रविण आंब्रे

    ReplyDelete
    Replies
    1. thank you for collecting right information

      Delete
    2. Dhanyawad........
      Jay Shivrayyyyyyy

      Delete
    3. Aplya Hindu dharmatil brahmanane Vish pajale yacha mala khup dunkh ahe (are jya rajyane Hindu sathi pran panas lavle tynah saga )

      Delete
    4. Dileli mahiti khup chan ani abhyasu aahe. Atta hi mahiti kewal google var pan sarvsamanya paryant pohchavi ya sathi prayatn zale pahije

      Delete
    5. This comment has been removed by the author.

      Delete
    6. इतिहास मध्ये काही लोग चुकीच्या गोष्टी करतात आणि आज पण. चुकीच्या लोग आहेत म्हणून समजला दोष देऊ नये. सर्वच लॉग चुकीचे नसतात. जातीला दोष देऊ नये. जाती पडल्या हेच चुकीच्या आहेत. याला लोकवर पूर्वी ब्राह्मण समाजाने जबरदस्ती बिंबावले हे मी समजतो. पण आता पण तसच आहे असं नाही हे सुद्धा अनुभव घेतला आहे पूर्णपणे बदल नसेल पण बदलत आहे हे नकी.
      शिवाजी महाराजनी सर्वाना एकत्र करायचा प्रयत्न केला. भले त्यांना यश आले नाही त्याचे बळी गेले असतील पण अजून दोष देऊन गप्पा मारणे चुकीचे आहे. प्रत्येक माणसाने जात, धर्म सोडून एकत्र आले तरच सिद्ध करू शकतो की आपण देशाला एकत्र बांधुन करू शकतो. आणि विम्सनस्य कमी झाले तरच देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो.

      Delete
  2. jai jijau,jai shivray,jai shambhu raje..
    mi aapla blog vachla mala yatun barech kahi je mahit navte te mahiti zale .
    shivaji maharajachya mrutu babtcha mazya manatil prashn sutla pan sambhaji raje yancha mrutu kasa zala ki to pan daga fatka hota ?
    krupya ya prashnache nirsan karave hi vinanti ..vishh ( uddhav shelke,murud,ta;latur )

    ReplyDelete
    Replies
    1. Sambhaji hi Kadambari vachavi...

      Delete
    2. संभाजीराजे कवी कलशासाोबत शांक्तपंथीय अनुष्ठाने करीत हाोते व गा॑॑फिल हाोते. त्यांचे साोबत फक्त 400-500चे सैन्य हाोते. जेष्ठ सरदार मल्हारराव घाोरपडे यांनी ग॑निम चालुन येत असल्याबाबत सां॑गितले पंरतु अंबाघाट उतरुन माोगली सैन्य हया नि॑बिड जंगलात उतरेल यावर त्यांचा विश्वास नव्हता व ते गा॑॑िफल राहीले.

      Delete
    3. Sambhaji maharaj gafil navate. Tyanchya mehunyane tyana daga fatka dila ani tyanchi location chi mahiti dushmanala dili .

      Delete
  3. विषप्रयोग झाला हे सारे जाणतात. काही ब्राह्मणी विचारांना बळी पडून सोयराबाई ही यात सामील होत्या असे समजतात. पण त्याच वेळी शंभूराज्यांनी सोयराबाई यांना कधीच अटकही केले नाही व कोणताही त्रास दिला नाही उलट खुणानंतर ५-६ महिन्यांनी संभाजीयांनी सोयराबाई यांना गौरवले त्याचा सन्मान केला ! याचा वर पुरावा दिलेला आहे. म्हणजेच सोयराबाई या निर्दोष होत्या हे कोणीही खरा शिवप्रेमी कबुल करेल. म्हणजेच शिवरायांचा खून हा केवळ स्वराज्य बळकावण्यासाठी ब्राह्माण मंत्र्यांनी केलेला ब्राह्मणीकावा होता हे सिद्ध होते.


    yatunach vish prayog zala navhata he sidhdh karata aahat. (khare khote dev jane ).
    pan jar sambhaji rajanna mahit hote ki vishprayogat soyarabaincha hi samavesh hota tar mag tyanni tyancha satkar ka kela.......?

    ReplyDelete
    Replies
    1. संभाजी राजानी
      फ़क्त सोयराबाईच नाही तर सगळ्या कट वाल्याणा मुक्त केल त्यांचा सत्कार पण केला आणि सगळ्यांना स्वराज्याच्या कामात परत सामावून पण घेतल

      पण याचा अर्थ असा होत नाही की हे सगळे निर्दोष होते
      सगळे ब्राम्हण मंत्री जरी परत कामा वर आणि त्यांच्या पदा वर परत रुजू झाले तरी
      सोयराबाईना नजर कैद मधेच ठेवल आहे त्यांना तेवढी मोकळीक दिलेली नाही हे पण लक्षात घ्या

      संभाजी राजानी सोयराबाईना स्फटिक मनाच्या अस म्हणल आहे
      पण त्या त्यांच्या आई आहेत हे पण लक्षात घ्या

      आणि सोयराबाई साहेब ह्या स्वराज्याच्या महाराणी आहेत महाराजांच्या खालोखाल त्यांचा शब्द चालणार
      त्यांच्या संम्मति शिवाय राजारामाना गादी वर बसवायच कारस्थान होऊच शकत नाही
      ब्राम्हण हे फक्त मंत्री आहेत घरातला कोणी माणूस जो पर्यन्त ह्या सगळ्या मधे सामिल होणार नाही तो पर्यंत असा कट होऊच शकत नाही

      आणि ब्राम्हण जर कपटी असते तर
      मुरारबाजी आणि बाजीप्रभु यांची बलिदान फुकट गेली का।मग
      डाबिर अणि सोनादेव आग्र्याला महाराजाना सोडवताना 9 महीने फौलाद खानाच्या कैदे मधे सापडले
      त्यानी छळ सहन केला पण महाराजांचा प्लान नाही सांगितला ते जर तेंव्हाच् कपटी निघाले असते तर महाराज आले असते का परत

      Delete
    2. तुम्ही बोलताय ते खरं असेल पण झाडावरचे सगळे फळे खराब नसतात
      दोन - तीन फळे चांगली असली तर आपण सगळे फळे चांगली आहेत अस तर नाही ना म्हणत

      Delete
    3. Mr.Rawade..... saglech Sarkhe nastat tase 700 Muslims pan Rajanchya sainyat hote te Swarajya sathi ladhle Tyani jat dharm nhi baghitla ani Aple Raje kontyahi jatichya ani dharmachya virodhat navte Mhanun sarv jatiche lok tyana support karat hote History madhe lihile ahe ki Afzal khana la marlya Nantar tyanchi 2 mulana pakadle hote Mavlyani pan maharajani tyana sodun dile tyanchi dushmani kontyahi jati kiwa dharma barobar navti tyanchi dushmani hoti ti Fakt Swarajya chya aad yenarya lokanshi Mg to konihi aso kontyahi jati dharma cha aso bramhan, Muslim, Maratha kontahi bhedbhav kela nhi Rajani Karan Baji ghorpada ha Maratha Jo Swarajya chya virodhat hota tyalahi Rajani marle ani ek gosht lakshat thewa Ase jati bhed karun Ethe vaad ghalnyapeksha history nit samjun ghya ani maharajanche vichar samjun ghya Nuste samjun gheu naka tar achranat aana..

      Delete
  4. jari he khare asle tari aamcha visahwas bramnanvar nahi karan te aadogar pasun kapti manache hote yat til matra shanka nahi karan shivaji raje aamce kalyan kari raja hote prashant katke

    ReplyDelete
    Replies
    1. What about bajiprabhu Deshpande & murarbaji Deshpande?

      Delete
    2. Are saglech Sarkhe nastat tase 700 Muslims pan Rajanchya sainyat hote te Swarajya sathi ladhle Tyani jat dharm nhi baghitla ani Aple Raje kontyahi jatichya ani dharmachya virodhat navte Mhanun sarv jatiche lok tyana support karat hote History madhe lihile ahe ki Afzal khana la marlya Nantar tyanchi 2 mulana pakadle hote Mavlyani pan maharajani tyana sodun dile tyanchi dushmani kontyahi jati kiwa dharma barobar navti tyanchi dushmani hoti ti Fakt Swarajya chya aad yenarya lokanshi Mg to konihi aso kontyahi jati dharma cha aso bramhan, Muslim, Maratha kontahi bhedbhav kela nhi Rajani Karan Baji ghorpada ha Maratha Jo Swarajya chya virodhat hota tyalahi Rajani marle ani ek gosht lakshat thewa Ase jati bhed karun Ethe vaad ghalnyapeksha history nit samjun ghya ani maharajanche vichar samjun ghya Nuste samjun gheu naka tar achranat aana.....

      Delete
    3. very true harshad, Shaju maharajanni Peshwai chi vastre Bhat layak hote mhanunach dili na,kee jyanni maharajanche samrajya atkepaar nele

      Delete
    4. Hya post cha written 💯% Sambhaji Brigade( fake muslim Brigade) cha asanar. He lok pratek vela bramhanana target kartar.

      Delete
  5. @ uddhav Shelake :-
    Sambhaji raje yanche balidanavar hi lavakarach blog yeil...
    Sobat Tukobanchya sanshae vaikunth gaman, shahu maharaj yanche achanak jane, Bharat buddha mai karanyachi shapath ghetalya nantar aani Buddha dharm swikarlya nantar keval 2 mahinyat jhalelya Ambedkar yanche Mahaparinirvan yacha hi yat samavesh asel.

    ReplyDelete
    Replies
    1. लिहायला काही हरकत नाही साहेब
      पण ज़रा सोबत लिखित पुरावे पण दया
      कारण आता वाचक हे सुज्ञ आहेत

      कारण तुकाराम महाराजांचा खून झाला ही गोष्ट 1650 मधे महाराजाना नाही समजली
      आणि 2012 मधे तुम्हाला समजली या वरुण महाराजांच्या पेक्षा सुद्धा तुमच हेर खात किती सक्षम आहे याच आश्चर्य वाटत आहे मला
      त्यामुळे असे जावई शोध फ़क्त तुम्हालाच लागू शकतात
      भारत बुद्धमय करायच स्वप्न पाहिल्या नंतर 2 महिन्यात आंबेडकारांचा मृत्यु झाला हे अतिशय वाईटच झाल
      पण त्याचं स्वप्न तुम्ही पूर्ण करू शकता फ़क्त गप्पा मारन्या मधे काय अर्थ आहे
      जाती व्यवस्था मोडून काढ़ा पहिली
      आणि सुरवात तुमच्या पासून करा
      दलित मुलीं बरोबर लग्न करा
      दलित घरात आपल्या मूली लग्न करुण पाठवा
      आपोआप सगळा भारत बौद्धमय होईल

      स्वता लग्न करताना 96 कुळी मराठा 92 कुळी मराठा पाहुन लग्न करायच
      आणि आम्हाला आंबेडकर शिकवायचे याला काय अर्थ आहे
      समाजा पुढे आदर्श घालून दया
      समाज उपयोगी काम करा आणि मग आम्हाला ज्ञान दया

      Delete
    2. This comment has been removed by the author.

      Delete
    3. Hi sarv mahiti janun ghenyasthi sarvani "chava" hi kadanbari vachsvi tyat sarv ahe

      Delete
    4. MrRawade...jar tukaram maharajanchya Khun jhala nahi tar mag te ka, kharach vaikunthala ghele Ka??? Tumhala tari thoda sense aahe Ka jar manushya janmatach nahi tar itar kontyahi prakarat mag to prani, pakshi, jhade , manushya janmat atma pravesh karto tenvha tyala tyatun mukkti faqt mrutunantarach milate...hyasathi tumhi Devonke Dev Mahadev serials Che episode neet paha...mag uttar sapdel tumhala...bramhananni pratek Veli samajat swataha konitari uchha aslyache bhasavle aahe aani aajagi tech karat aahet...jara abhyas neet Kara tumche knowledge ajun kachhe aahe itihasachya babtit��

      Delete
  6. tasech Baliraja, pasun gandhi hatte paryant ya blog var .
    .
    .,
    brahman khuni parampara nagadi keli janar aahe.

    ReplyDelete
  7. संपूर्ण ब्लॉग वाचल्यावर फक्त एका ठिकाणी प्रश्न पडतो कि.......मोगल पुत्र अकबर या प्रकरणात कुठून आला? संभाजींच्या काळात औरंगजेब हा मोगल सम्राट होता..............अकबराचा काळ हा फार पूर्वीचा होता..............कि हा अकबर कोणी दुसराच होता?
    ब्लॉग वाचून पुरेपूर माहिती भेटली.......परंतु सत्य कथन करताना एखाद्या विशिष्ट जाती बद्दल असे लिहिले जाऊ नये.............अजून काही माहिती असेल तर जरूर पोस्त करावी...............वाचायला आवडेल................

    ReplyDelete
    Replies
    1. "सुलतान मुहम्मद अकबर" औरंगजेबाचा मुलगा. कृपया विश्वास पाटलांची 'संभाजी' कादंबरी वाचावी....

      Delete
    2. khup chan kadambari ahe vishwas patil hyanni atishay sunder kadambari lihili ahe

      Delete
  8. ha lekh binbudacha ahe ani hyala kahich artha nahi . lekhakacha jatidwesh disto

    ReplyDelete
    Replies
    1. Tumchyakade jar Bud Aslela Itihas asel tar Lihun Dakhvava....
      Aamhi Baghu Mag to tumcha Itihas kasa aahe..
      Marathyachi Rani Soyrabainvar Ase aarop karayla laaj vatayla pahije...

      Delete
    2. सोयराबाई साहेब ह्या फ़क्त मराठ्यांच्या महाराणी नव्हत्या
      त्या स्वराज्याच्या महाराणी होत्या

      आणि एक गोष्ट लक्षात आली का..??
      सोयराबाई साहेबा नंतर महाराष्ट्रा मधे कोणीही आपल्या मुलीच नाव सोयरा अस ठेवलेल आढळत नाही
      मराठी माणूस किती कड़वा आहे ते पहा ज़रा
      समजल का काही

      Delete
    3. Haramkhor salya 350 varshya nantar konya brahmanache nav shivaji ani sambhaji thevlele adhale ka tula?
      Amhala shikhau nakos maharajanchya family baddal..

      Delete
    4. sarva itihaas baghun ani bajirao ani nantar peshwe nana yanchyanantar cha jar itihas jar baghitla tar ekun ase ahet ki sarva lok milun swarajya ani fakt swarjya ya sathich ladhale.... Nahitar bhosalenantar peshwe ka????? ha atimolacha prashna ani Bajiraoni tar shahuji ani yesubai yaana moghalaanchys tawaditun sodawun parat anle .....

      Delete
  9. sambhaji brigade pranit brahmandeshtya dharmadrohyacha ha lekh ahe

    ReplyDelete
    Replies
    1. अरे गांडु, मुद्द्याच सांग कि काही का काहीतरी बरळून पळ काढणार

      Delete
  10. इतिहास घडविला मर्द मराठ्यांनी तलवारीच्या जोरावर आणि इतिहास पळविला भटाच्या कावळ्यांनी लेखणीच्या जोरावर
    इतिहास घडविण्यासाठी रक्त आणि मनगट लागते मर्दाचे कारण आणि इतिहास लिहिण्यासाठी रक्त आणि मन लागते कावेबाज षडयंत्री कोल्ह्याचे
    शूद्रांना व अतिशुद्राना लिहिणे, शस्त्र, चालविणे संपत्ती बाळगणे असे हजारो अधिकार नव्हते आणि सर्व अधिकार देवाचा बाप, भूदेव, कलमकसाई, भटांच्या कावळ्याकडे होते
    इतिहास आम्ही लोकांनी घडविला आणितो इतिहास स्वतःच्या नावावर केला युरेशियन बमानानी तेव्हां त्यांनी लिहिलेला इतिहास सबळ पुरावा म्हणूनच खरा मनाला जातो आम्ही लिहिलेला इतिहास खोटा ठरविला जातो. त्यामुळे कोणीही बमानाने काहीही लिहिले तरीते खरे माणू नये, तो सर्व बुद्धाच्या तर्क कसोटी वर तपासून पाहावा हि नम्र विनंती

    ReplyDelete
    Replies
    1. आता तुम्ही लिहिलेला इतिहास पण तर्क बुद्धि च्या कसोटी वर तपासून घ्यायला हवा हे नक्की

      मला ज़रा मुद्देसूद सांगा
      1- कोणता इतिहास पळवला बामनानी
      2-आता जो उपलब्ध इतिहास आहे तो कोणी लिहिला आहे..???
      तो जर लिहिला नसता त्यानी तेंव्हा तर
      बाजी पासलकर
      बाजी जेधे
      कान्होजी जेधे
      तानाजी मालुसरे
      संभाजी कावजी
      सूर्याजी काकड़े
      नेताजी पालकर
      प्रतापराव गुजर
      हंबीरराव मोहिते
      धनाजी जाधव
      संताजी घोरपडे
      हे सगळे कोण होते आणि ह्यांनी कसा पराक्रम केला हे लिहायला कोण गेल असत..???

      3-क्षुद्र आणि अतिक्षुद्र याना जर शस्त्र चालवायचा अधिकार नव्हता तर
      पुरंधर कोणी लढवला
      शिवा काशिद पन्हाळ्या वर कसा काय आला..??
      वरचे सगळे योध्हे यांची जात एकदा मला सांगा

      4-गावचा पाटिल
      किंवा खोऱ्याचा देशमुख ही त्या भागाची वजनदार माणस कोणत्या जाती ची असायची...???

      5-एका गावात एक ब्राम्हण असतो आणि एक पाटिल असतो बाकी त्या गावात सावकार आणि श्रीमंत माणूस अशी साधारण माणस असतात
      ते सगळे एकाच आड़नावाची म्हणजे एकाच भावकी ची असतात
      त्या संपूर्ण गावा वर एका ब्राम्हण माणसाची सत्ता कशी काय चालत असेल..?

      6-कोणता तुम्ही घडवालेला इतिहास युरेशियन बामनानी त्यांच्या नावा वर केला एक उदाहरण सांगा

      7-त्यानी लिजिलेला इतिहास पण पुरावा तपासून मगच स्वीकारला जातो
      डोळे झाकून कोणी वाचत नाही
      आता तुम्ही बाजीप्रभु ऐवजी बाजी बांदल होते अस आम्हाला सांगताल तर जेधे शकावली आमच्या कड़े पण आहे आम्ही ती वाचली आम्हाला समजत की ते बाजीप्रभुच् होते आणि मग तुमचा इतिहास कसा खोटा आहे हे समोर येत

      बामनानि लिहिलेल खर मानायच का नाही ते तर आम्ही पाहुच
      पण अगोदर ज़रा तुम्ही खर आणि योग्य लिहायला सुरवात करा



      Delete
    2. त्यांनी काय सगळेच इतिहास लपवले असे नाही,काही गोष्टी नाही लपावता येत, उघड़ उघड़ असतात त्या गोष्टी,आता एक उदाहरण घेऊ,शिवाजी महाराजांची समाधि महात्मा फुलेंनी शोधून काढली,ही गोष्ट मला जेव्हा कळाली तेव्हा खरी नाही वाटली, पण ते खरे आहे?आता कशी लपविली,बाकीचे निष्ठावान काय करत होते?मग टिलकांनी कधी सुरु केलि शिवजयंती?लोकांनी कसे मान्य केले ते की टिलकांनीच चालु केलि म्हणून,paathypustakaat ज्यावेळी ते टाकले गेले ,का कोणी विरोध नाही केला?त्यावेळी तिथे बहुजन अस्तिलच ना?

      Delete
    3. त्यांनी काय सगळेच इतिहास लपवले असे नाही,काही गोष्टी नाही लपावता येत, उघड़ उघड़ असतात त्या गोष्टी,आता एक उदाहरण घेऊ,शिवाजी महाराजांची समाधि महात्मा फुलेंनी शोधून काढली,ही गोष्ट मला जेव्हा कळाली तेव्हा खरी नाही वाटली, पण ते खरे आहे?आता कशी लपविली,बाकीचे निष्ठावान काय करत होते?मग टिलकांनी कधी सुरु केलि शिवजयंती?लोकांनी कसे मान्य केले ते की टिलकांनीच चालु केलि म्हणून,paathypustakaat ज्यावेळी ते टाकले गेले ,का कोणी विरोध नाही केला?त्यावेळी तिथे बहुजन अस्तिलच ना?

      Delete
  11. Jai Jijau,
    AApan Lihun aamhala sahkary kelet Dhanyawad..
    Aani ho ya blogla jar koni virodh kela tar tyala khara Itihas lihayla sanga..
    Vishal Bhosale,
    Latur...

    ReplyDelete
  12. Pramod Shinde (Sarkar), Apan Khup Abhas Karun Atishay Mahtipurna Likhan Kele Ahe, Aple Abhinandan, Rajana Badal, mahiti vachun pratksha raigad somar ubha rahla, ani man bharun ale. jai shivrai.

    ReplyDelete
  13. in this one person Hambirrao Mohite played great role he made great sacrifice he could have given help to ministers and made Rajaram king but his honesty toward His Highness Chhatrapati Shivaji maharaj was great And uncomparable i bow my head & salute Hambirarao Mohite.

    Jay Jijau ! Jay Shivaray !

    ReplyDelete
  14. नाण्याला दोन बाजू असतात...
    असं जरी आपण मानलं....आणि
    काहींनी या गोष्टी खर्या ठरवल्या आणि काहींनी खोट्या.....
    तरीही आपणच आपल्या थोर,आदर्श, हिंदवी स्वराज्य संस्थापक,
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या अविस्मरणीय इतिहासाचे;
    धिंडवडे काढत आहोत....असंच मला वाटतंय......
    आणि त्यामुळेच हे वाचताना मन दुखी , कष्टी आणि विषन्न होतंय.
    त्यापेक्षा आम्ही आमच्या प्राथमिक शाळेपासून जे ऐकत आणि वाचत आलो...
    तेच योग्य वाटते....त्यामध्ये कुठेही अशी राज्यांची बदनामी तरी नव्हती.
    मग ते दादाजी कोंडदेव गुरु असोत...यशवंती घोरपड असो...किव्वा,
    संत रामदास आणि संत तुकाराम महाराज याची महाराजांबरोबरची भेट असो.
    महाराजांच्या नखाचीही सर न येणार्यांना किव्वा ती लायकी नसणार्यांना,
    हे फेसबुक स्वातंत्र्य मिळालंय...नवा दुर्दैवी इतिहास लिहायला....असंच वाटतंय.
    मी तुमच्या सर्वच मतांशी असहमत आहे असं नाही....
    लिहायला पण पाहिजे चुकीच काही असेल तर खरा इतिहासहि लोकांना कळला पाहिजे;
    वगैरे..वगैरे ठीक आहे वो...पण.......
    जरा आपल्या उद्धारकर्त्याची तरी आठवण ठेवून...
    आणि त्यांचे स्मरण करून हे लिहावे असंच वाटतंय.
    ......एक सच्चा शिवभक्त.
    .....ना मराठा...ना ब्राम्हण.

    ReplyDelete
    Replies
    1. khup chan chatrapati shivaji maharajan chi badnami karnya ch kam kahi maratha ch karat ahet maharajani kadhi jati pati manlya navhtya brahmanan baddal chuki cha samaj pasravnyat yet ahe

      Delete
  15. Lekhakane je lihile aahe te 101% khare aahe.
    For E.g.:
    1.Mahamanav Bharat Ratna Dr. Babasaheb Ambedkar yana bramhanani kelela ayushyabhar virodh.
    2. Thor Samaj Sudharak Krantijyoti Mahatma Jyotiba Phule yana ayushyabhar bramhanani virodhach kela.
    3. Sant Dnyaneshwar Maharaj ani tyanchya kutumbala kelela virodh.
    4. Sant Tukadoji Maharaj yana bramhanani kelela virodh. Etc.

    Ya sarv goshtivarun aapanas he lakshat yete ki Chatrapati Shivaji Maharaj yancha Bhrashta Bramhananich khun kela aahe.

    ReplyDelete
    Replies
    1. चव्हाण साहेब
      ब्राम्हणानि आंबेडकर, महात्मा फुले याना त्रास दिला
      आणि मराठा समाजाने काय पायघड्या घाटल्या आहेत का..??

      आजही त्याना चाहा ची कप बशी वेगळी असते की आपल्याच मराठ्यांच्या घरात
      अजुन ही मराठे जेवतात का त्यांच्या पंक्ति ला
      अजूनही त्याना सहजा सहजि घरात प्रवेश आहे का मराठ्यांच्या
      अजूनही त्यांच्या मुलीं बरोबर मराठे लग्न करतात का किंवा त्यांच्या घरात मूली देतात का..??

      उगाच दुसर्याला दोष नका देऊ
      आपण काय करतो ते पहा ज़रा

      Delete
    2. he bagha banudas saheb tya veli char varn hote 1>kshtriya,2>bramhan,3>vaishya,4>shudra mag apli maratha hi jaat kuthe na kshatriyat na bramhanat na vaishyat because kshatriy aste tar shahaji rajyani vatandari ka swikaravi...bramhan tar aapn nahich vaishya hi nahi shevti rahila varn shudra karan chatrapati shivaji maharaj yancha rajyabhishek karnyas kashivarun gaga bhatta ka bolavala....rajya bhishek kartana ulta ka kela aho soppa ahe na maharajyanchi aplyala jayanti kontya tarkhi kararvi he kalat nahi ani mhane aapn 96kuli maratha....ek critic

      Delete
    3. Bhanudas Rawade

      भानुदास राव,
      तुमच्या बोलण्यातून फक्त बहुजनसमाजाच्या प्रतीची कळकळ जाणवतेय, तुमच्यासारखी मोजकी माणसे आपल्या देशात आहेत म्हणूनच अजूनही तुम्ही जातीयवादाला खतपाणी घालताय. लेखकाने इतिहासातील इतके अचूक संदर्भ देऊनदेखील तुम्ही ते मानायला तयार नाहीत. आणि हो विषय राहता राहिला जातिव्यवस्थेचा तर आपण शिवरायांच्या इतिहासाबद्दल बोलतोय. त्याविषयीचं आपलं मत लिहायचं सोडून तुम्ही जातीयवाचक विषमल्ली परिपूर्ण असलेली तुमची केविलवाणी मतं मांडताय.

      आम्ही दलित सवर्ण कधीच मागे टाकलंय, तुम्हालाच जातीच्या कुबड्या हव्या आहेत कारण आरक्षणाच्या कवकावर अवलंबून, विसंबून राहणारी तुमच्यासारखी परपोषी माणसेच जातीची विषारी मुले येणाऱ्या पिढ्यांच्या मनात रुजवता. इतिहास वाचा आणि आता तरी सुधारा स्वतःला

      अरे जर आमचे छत्रपती शिवराय नसते तर आज तुम्ही मी आणि आल्या सगळ्यांचं धर्मांतरं झालं असत. त्यांची पुण्याई थोर म्हणून देशात इतर धर्माचं अस्तित्व टिकलं.

      तेव्हा भानुदास राव, फक्त नाव भानुदास असण्यापेक्षा तुम्ही भानावर येऊन तुमचं मतं मांडलात तर नक्कीच ते स्वागतार्ह ठरेल.

      जय शिवराय, जय हिंद,जय महाराष्ट्र!!

      Delete
    4. एक दम बरोबर

      Delete
    5. एक दम बरोबर

      Delete
    6. एकदम बरोबर

      Delete
  16. jai jijau jai shivray..jai shambu raje....
    ha blog vachun kharach me dhanya zhalo ..dhnya te raje dhanya te shambu maharaj..dhnya tya soyarabai mata

    ReplyDelete
    Replies
    1. हां ब्लाग वाचून जर तुम्ही धन्य झाला असताल तर फक्त देवच तुम्हाला वाचवु शकतो

      Delete
  17. आरे हे संभाजी ब्रिगेडचे विचार आहेत. हिंदुधर्म विरोधी आणि बामसेफ सारख्या विदेशी अर्थ पुरवठ्या वर चालणार्या या संघटनांचे अंतरंग चा शोध घेतला पाहिजे ... मग कळेल कि यांचा बोलावता धनी कोण आहे. आणि यांचा इतिहास पुनर्लेखनाचा हेतू काय आहे. फार अस्वस्थ होण्याचे कारण नाही. संभाजी ब्रिगेडचे, जिजाऊ ब्रिगेड, आणि शिवधर्माचे काही विकृत विचार तूला सांगतो : १. शिवरायांचे खरे शत्रू हे ब्राम्हंच होते. (पण महाराजांनी निम्म्याहून अधिक लढाया स्वजातीच्या आणि भावकीच्या मराठ्यांशी लढलेल्या आहेत आणि अनेक ब्राम्हण जातीतील मावळे स्वराज्यासाठी कामी आले.. खरे तर सैनिकाची जात बघू नये असे म्हणतात ) २. तुकाराम महाराजांचा खून ब्राम्हणांनी केला. ( पण जर असे झाले असते तर शिवरायांनी त्या ब्राम्हणांना जिवंत ठेवले असते ? तुकोबा प्रसिद्ध संत होते. ते हजारो वैष्णव भक्तांच्या मध्ये कायम असायचे. ) ३. संभाजी महाराजांचा हत्या ब्राम्हणांच्या सल्यानुसार औरंगजेबाने केली, आणि म्हणून दुसऱ्या दिवशी ब्राम्हणांनी गुड्या उभ्या केल्या आणि तेंव्हा पासुन गुढीपाडवा हा सन सुरु झाला. (पण... काय बोलावे या अकलेच्या तारे तोडणार्यांना ) ४. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करणाऱ्या गागा भट्टांनी महाराजांच्या कपाळाला पायाच्या आंगठ्याने गंध लावला.. (पण असले इतिहास संशोधन करून ह्यांना हे सिद्ध करायचे आहे का कि महाराज षंढ होते ? हा महाराजांचा घोर अपमान आहे ) ५. मराठ्यांनी आपल्या घरातील देवघरे तोडून टाकावीत आणि मराठ्याच्या बायकांनी कपाळाला कुंकू लाऊ नये कारण ते ब्राम्हणी हिंदुत्वाचे प्रतिक आहे . ( हे विचार देशभक्तीचे आहेत ? ... का स्वार्थासाठी स्वतःची आई, बहिण, आणि बायको यांनाही विकणाऱ्या दलालांचे आहेत ) आसो हे असले इतिहास संशोधन करून ह्यांना काय सिद्ध करायचे आहे ते कोणालाही सहज कळेल. ब्राम्हणांचे भूत उभे करून बहुजन समाजाला हिंदुत्वाच्या कार्या पासून तोडण्याचे हे कारस्थान आहे. कारण फक्त हिंदुत्वच देशाला बधून ठेवणारे सूत्र आहे. म्हणून तर स्वामी विवेकानंदांनी गर्जना केली होती " हिंदू असल्याचा अभिमान बाळगा " (गर्व से कहो हम हिंदू है )
    हे नवे इतिहासकार असल्या विचाराची पुस्तके छापतात आणि राजकीय आशीर्वादाने मोठी मोठी परितोशके मिळवून स्वतःला इतिहासकार म्हणवतात . खंडो बल्लाळ च्या वडिलांना संभाजी राजांनी हत्तीच्या पायाखाली दिले हे खरे आहे पण गैरसमजातून . त्यांची स्वराज्य निष्ठा इतकी जबरदस्त होती कि मृत्यू पूर्वीच्या रात्री त्यांनी खंडो बल्लाळ यास बोलून घेतले आणि स्वराज्याच्या कामात संभाजी महाराजांशी एकनिष्ठ राहण्यास सांगितले. हाच खंडो बल्लाळ पुढे शंभू राजांचा अंगरक्षक झाला आणि त्याने दोन वेळा शंभू राजांचा जीव वाचवला. असो लिखाणाला मर्यादा आहेत.... त्याच्या मर्यादांना मन दिलाच पाहिजे परंतु facebook वर विचारलेस म्हणून उत्तर देतोय कारण वाचणारे अनेक लोक आहेत. त्यांना दुध का दुध ... झाले पाहिजे.

    ReplyDelete
    Replies
    1. शंभर टक्के योग्य आहे... इथे कोणत्याही जातीचा संबंध नाही जो इतिहास खरा आहे तो आहे. जर हे खोटे असते तर संभाजीराजेना छत्रपती करण्याऐवजी राजाराम महाराजांना छत्रपती का केले? स्वराज्याचे छत्रपती बनण्याचा अधिकार शंभूराजेंचा असताना... तो हिरावून घेवून गुपचूप राजारामास छत्रपती केले यावरून स्पष्ट होते की... कोणीतरी आपल्या स्वार्थासाठीच हा डाव मांडला होता. बर हे सुधा खोटे वाटत असेल तर मग महाराष्ट्राच्या गादीवर पेशवे कसे आले? खरा मान तर छत्रपतीच्या वंशजांचा मग पेशवे कसे राजे झाले?
      कपटीडाव खेळूनच ना.... जो आपण इतिहास सांगितला तो खरा वाटतो न्हवे आहेच..! धन्यवाद

      Delete
    2. भारताचा मूळ इतिहास पहिला वाचावा आणि एकाच व्यक्तिने लिहिलेले वाचू नये हि विनंती.
      पेशवाई या काळापासुन भारताची सुरुवात झालेली नाही.
      ज्याला आपला इतिहास माहित नाही तो कधीच इतिहास घडवू शकत नाही.
      छञपती शिवाजी महाराज हे एक थोर महापुरुष ..त्यांचा ब्राम्हण लोकाना विरोध नव्हता तर त्यांची ब्राम्हणशाहीला आणि त्यांची पुरातण काळापासुन चालत आलेली दादागिरीला विरोध होता आणि ती महाराजांनी संपवली. तसेच शिवाजी महाराजांनी सगळ्या लोकांना गरीबांना, रयतेला, स्ञियांना एकसमान सन्मान दिला. जात धर्म भेदभाव केला नाही. याचा ब्राम्हणांना खूप राग होता आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पेशव्यांनी कट रचला. शिवरायांना राज्याभिषेक का करावा लागला हे पण जाणून घ्या..
      अजून एक सांगावसं वाटतं कि भारतिय मूळरहिवासी लोकांना या ब्राम्हणांनी जात पोटजात मध्ये विभागलं मिञांनो.......
      .... एक भारतिय...


      Delete
    3. भारताचा मूळ इतिहास पहिला वाचावा आणि एकाच व्यक्तिने लिहिलेले वाचू नये हि विनंती.
      पेशवाई या काळापासुन भारताची सुरुवात झालेली नाही.
      ज्याला आपला इतिहास माहित नाही तो कधीच इतिहास घडवू शकत नाही.
      छञपती शिवाजी महाराज हे एक थोर महापुरुष ..त्यांचा ब्राम्हण लोकाना विरोध नव्हता तर त्यांची ब्राम्हणशाहीला आणि त्यांची पुरातण काळापासुन चालत आलेली दादागिरीला विरोध होता आणि ती महाराजांनी संपवली. तसेच शिवाजी महाराजांनी सगळ्या लोकांना गरीबांना, रयतेला, स्ञियांना एकसमान सन्मान दिला. जात धर्म भेदभाव केला नाही. याचा ब्राम्हणांना खूप राग होता आपलं वर्चस्व कायम ठेवण्यासाठी पेशव्यांनी कट रचला. शिवरायांना राज्याभिषेक का करावा लागला हे पण जाणून घ्या..
      अजून एक सांगावसं वाटतं कि भारतिय मूळरहिवासी लोकांना या ब्राम्हणांनी जात पोटजात मध्ये विभागलं मिञांनो.......
      .... एक भारतिय...


      Delete
    4. Sambhaji raje shivrayanpashi nastana maharaj yancha mrutyu zala. Thorlya mulane antim sanskar dene astana ghait antyvidhi urkali mantrimandal ne ithech sare kutil kapti karsthan ughad hote. Sarv dharmachya navane bomb marnare ekach jatiche kase?

      Delete
    5. jya thor lokani samajyatlya jati bhedala muth mati dili tyach samajat vish kalavnya cha ghanerde kam he brigadi lok karat ahet

      Delete
  18. शंभर टक्के योग्य आहे... इथे कोणत्याही जातीचा संबंध नाही जो इतिहास खरा आहे तो आहे. जर हे खोटे असते तर संभाजीराजेना छत्रपती करण्याऐवजी राजाराम महाराजांना छत्रपती का केले? स्वराज्याचे छत्रपती बनण्याचा अधिकार शंभूराजेंचा असताना... तो हिरावून घेवून गुपचूप राजारामास छत्रपती केले यावरून स्पष्ट होते की... कोणीतरी आपल्या स्वार्थासाठीच हा डाव मांडला होता. बर हे सुधा खोटे वाटत असेल तर मग महाराष्ट्राच्या गादीवर पेशवे कसे आले? खरा मान तर छत्रपतीच्या वंशजांचा मग पेशवे कसे राजे झाले?
    कपटीडाव खेळूनच ना.... जो आपण इतिहास सांगितला तो खरा वाटतो न्हवे आहेच..! धन्यवाद

    ReplyDelete
    Replies
    1. साहेब संभाजी राजांना छत्रपति करण्या ऐवजी राजाराम महाराजाना गादी वर बसवल हे अगदी बरोबर आहे

      पण त्यात फक्त ब्राम्हण सामिल होते हे चुकीच् आहे
      सोयराबाई साहेब पण त्यात सामिल होत्या
      कारण त्या स्वराज्याच्या महाराणी होत्या त्यांच्या समंती शिवाय हे शक्य झाल नसत
      मोरोपंता च्या सोबत संभाजी राजांना कैद करायला गेलेली फौज ब्राम्हण नव्हती हे माहीत आहे का आपल्याला..???

      संभाजी राजां ऐवजी राजाराम महाराजाना गादी वर बसवन्या माघे त्यांचे अष्टप्रधान मंडळा बरोबर सुरवाती पासून बिघडलेले संबंध कारणीभूत आहेत

      आणि तुमचा आभ्यास बहुतेक कमी असावा म्हणून सांगतो
      महाराष्टाच्या गादी वर कधीच पेशवे आलेले नाहीत
      एका बाजूला तुम्ही त्याना पेशवे बोलता
      पेशवा म्हणजे पंतप्रधान
      आणि राजे हे सातारा गादी चे महाराजच राहिले आहेत हे तुम्हाला माहीत नसावे बहुतेक

      आणि दूसरा एक भाग लक्षात घ्या
      पेशवे हे कायम शेवट पर्यन्त पेशवे च राहिले आहेत
      पण सातारा गादी असताना सुद्धा
      कोल्हापुर चे भोसले राजे
      नागपुर ला राजे भोसले
      राजे गायकवाड़ बड़ोदा
      राजे सिंधिया गव्हालेर
      राजे होळकर
      ही राजघरानी कशी काय झाली सांगा मला
      ज्याना संभाजीराजांचे पुत्र शाहू राजे यानी सरदारकी दिली ते लोक राजे झाले आहेत

      आणि पेशवे हे शेवट पर्यंत सातारा महाराजांचे पेशवेच(पंतप्रधान) आहेत

      शिवाजिमहाराज
      नंतर संभाजी महाराज

      तिसऱ्या पीढित आपल्या महाराजानि कोणता पराक्रम गाजवाला सांगा ज़रा मला
      मग दोष दुसऱ्याला देता

      Delete
    2. Jay shivray
      Rajena mujra the hote mhanun aj APN ahat he visrunka


      Mag pidayna dosh dya

      Delete
    3. mag shivajirajani rajyabhisheka pasun suru kelela shivshak rajyanchya nidhana nantar koni bandh kela .......?

      Delete
    4. This comment has been removed by the author.

      Delete
    5. भानुदास साहेब - तुमच्या काही शंकांचे निरसन करण्याचा एक प्रयत्न करतोय

      1 ज्या प्रमाणे तुम्ही म्हणताय की राजाराम महाराजांना गादी वर बसवण्यात सोयराबाई राणीसाहेबांचा हात होता हे जर काही वेळा साठी खरे मानले तरीही त्या कटा मध्ये ब्राह्माण मंत्रिमंडळ सामील होते हे ही तितकेच सत्य ठरते - हे मंत्री मंडळ काही दूध खुळे नव्हते - ह्यांनी शिवाजी महाराज्यांच्या बरोबर प्रत्यक्ष राजकारणात कित्येक वर्षे भाग घेतला होता - त्यांना सोयरबाईसाहेबन हाताशी धरून राजाराम महाराजांना गादीवर बसवण्याचे फायदे नक्की माहिती होते - अर्थात जुने जाणते मंत्रिमंडळ लोभी - स्वार्थी होते हे सिद्ध होते
      2 अंतिम संस्कार करण्यासाठी ब्रह्माण लागतो - शक कर्त्याचा चोरून अंतिम संस्कार करताना लाज वाटली नाही का - की स्वार्थाने आंधळे इतके आंधळे झाले होती ही मंडळी
      3 शिवाजी महाराजांच्या बहुतेक सर्व किल्ल्यांचे किल्लेदार हे प्रभू समाजातील होते - ह्या प्रभू ( CKP ) आणि ब्राम्हण समाजातील वाद अलीकडच्या इतिहासात प्रसिद्ध आहे ( प्रभू ना ब्राम्हण धरावे की नाही ह्या बद्दल चा - त्या काळात रोटी - बेटी , किंवा इतरत्र संबंध नव्हते ह्या दोन समाजात - उलट बऱ्याच अंशी विरोधच होता आजही तो टिकून आहे - आहार भाषा etc वेगळे आहे )
      मुरारबाजी हे त्या प्रभू समाजातील ( सारस्वत वगैरे म्हणून नंतर - शौर्याच deficit भरून काढण्यासाठी त्यांचं ब्राहमणी करण करण्याचा प्रयत्न आहे - म्हणजे पूर्ण CKP चा )
      3. बाजी प्रभू ( देशपांडे हे वाटण असते ) हे शूर होतेच - पण पावन खिंड वगैरे प्रकाराला ऐतिहासिक पुरावा मिळत नाही - असे मी नाही निनादजी बेडेकर साहेबानी म्हंटले आहे ( you tube var आहेत videos )
      4 डबीर आणि सोनदेव - आग्ऱ्यात छळ : तुमच्या मता विरोधात मला असे वाटते की त्यांना माहीत नसावे की महाराज कोणत्या मार्गे वापस गेले ( अजून आधुनिक इतिहासकारांना खात्री निशी तो मार्ग नाही सांगता येत ) - आणि logically मला नाही वाटत की महाराज जेवढे ती थे असामी होत्या त्यांना बसवून सगळा मनसुबा इतका खुला करून सांगतील की कोणत्या मार्गे ते जातील किंवा कसे बाहेर निघतील वगैरे ( जिथे माहीतच नसेल ती थे अत्याचार सहन करण्याशिवाय पर्याय नाही )
      5 इतिहास पळवला : मराठे पानिपत हरतात - आणि राघोबा दादा अटकेपार झेंडे लावतात ( सदाशिव रावांचा नेतृत्व होत पानिपतात - दोन्ही कडे समान न्याय लावावा )
      असो फडके वाचा - नाना फडनविसना हिरो ठरवण्यासाठी इतिहासकार ऎतोहासिक पुरावे कसे चावून गिळंकृत करतात हे त्यांनी छान लिहिले आहे ( परत मी म्हणत नाही फडके म्हणतात )
      6. गायकवाड - शिंदे वगैरे का निर्माण झाले - maratha confidarecy काय आहे ( ती राज्य चालवन्याची काय पद्धत आहे - ती ( confideracy ) कशी तयार होत असते ) - ह्याचा अभ्यास केला तर कळेल की हे संस्थान कशे आणि का उभे राहिले ( ह्याचंबरोबर मराठयानी दिल्ली का नाही जिंकली - infact पेशवाई का अली आणि टिकली ह्याचे ही उत्तर ह्यातच आहे )
      ह्याही उपर हे जरी घराणे उभे राहिले तरी ही हे विसरू नये की ह्याच घराण्यांनी पानिपतात फोजा लढवल्या ( पानिपतच्या सुरुवातीला - बचेंगे तो और भी लढेंगे म्हणणार दत्ताजी शिंदे - पानिपत नंतर शरीरावर 65 घाव पेललेल्या पार्थिव कडे बघून तोंडात बोटे घालणारा अबदली हा गाईकवाडांच्या पार्थिवाकढेच बघत होता - पाणीपतास कारणीभूत असलेल्या नजीब खान चे थडगे फोडणारा महादजी शिंदेच होता )
      त्या मुळे हे घराणे जरी confideracy म्हणून वेगळे संस्थान असले तरीही स्वराज्य साठी आहुती देणारेच आहेत ( गादीवरील छत्रपतींना कैद करण्याचा - मुजरा ना करण्याचा - अपमर्द होईल असे वागण्याचा इतिहास ह्या घराण्यांना नाही - कोणास आहे ते आपण शोधावे )
      7 पराक्रमाचे गणित : शिवाजी आणि संभाजी ह्या नंतर कोणी काय पराक्रम केला हे सांगावे तर त्यात ताराराणी राणीसाहेब पासून ते थेट शाहू महाराज ह्या पर्यंत यावे लागेल ( बाजीराव नंतर पेशवाईत काय चालले होते असा प्रश्न विचारून मी थोर पुरुषांच्या पराक्रमाची गणित मांडणार नाही )

      असो लिहिण्या सारखे बरेच मुद्दे आहेत पण इथेच संपवतो ( एक शेवटचे : विवेकानंद हे आज काल वापरायला सोप्पे झाले आहेत - हिंदू म्हणून जन्म घेण्यात आपले काहीही कर्तृत्व नसते त्या मुळे गर्व वगैरे बाळगण्याचा काहीही अर्थ नाही - उलट आम्हाला तर माहीत आहे की गर्वाचे घर खाली असते म्हणून )

      Delete
  19. Blogwr satya tech lihilay yat dumat nahi
    lekhak he kam krtay yacha abhiman ahe

    JAY JIJAU- JAY SHIVRAY-JAY SHAMBHURAJE

    ReplyDelete
  20. www.jwalant-hindutw.blogspot.com/

    ReplyDelete
  21. blog varti atishay sundar paddhatit aamchya sarkya shiv bhaktanna mahiti bhetli......
    ya baddal koti koti dhanya vad.

    jay maharashtra
    jay shivaji
    jay jijau
    jay sambhaji

    ReplyDelete
  22. Nuste Jay Shivaji and jai Shambu mhanun kahi honar nahi... ani ithas badla janar nahi... Bramhanancha itihas ujwal hota ani ahe... "Abhalakade pahun Thukalat tar ti tumchyach tondavar padel"

    Shivaji Raje Thor hote hyabaddal konalahi shanka kiva dumat asnachy karan nahii pan mhanun tya sathi Bramhananna vait tharavnyachi garaj nahi...

    Chatrapatinna rajya karbhar sambhalta ala nahi mhanun pudhe tyannich "Peshve" he pad nirman kela ani rajya vadhavle.

    Jai Shivaji, Jai Bhavani, Jai Parshuram.

    ReplyDelete
    Replies
    1. Ani aakhi maratha jaat thukli tr tumhi mutt bhar lok vahun jatil hich tumchi layki a bhadvya...himmat nahi bc naav lihachi ani jast badbad karto a....aukatit rahaycha..ani peshva peshva karto a na tu tula sangto peshwa he chatrapitinchya hatakhali nokar chakri karayche kalal...ani tyancha sainya he peshwa ani bramhan navta te maratha sainya hota ky maratha...tuzi aaukat nahi sadha mi mutlo tr pur yeil tumchya ghrat ani aakhe tumchya sarkhe lok vahun jatil kalal...so language sambhalun bolaychi..ani himmat asel tr nav takaycha.naav shubham a maza kalal

      Delete
  23. Shivaji Maharaj ani Sam;bhaji Maharajanahi Swakiya shich ladhave lagle Sambhaji Maharajancha Thav Thikana tar Ganoji Shirkeni dila.

    Var keleli lekhan popatpanchi he manat ala vichar mandala he tathakathin nav ithas lekhan karnyanyana shobel asel sarvasamnya marathi manus a bakwas vachnar nahi.

    ReplyDelete
  24. Niradyogi lokanche kam ahe he.... tya peksha sakaratmak kama kara.....

    ReplyDelete
  25. Sambhaji he shivajiraje swataha jivant aastana dilerkhanala jaaun ka milale???? Nusatech gele nahi tar chakanchya killyavar chalun gele... mhanajech raje jivant aastanach hi thingi chalu zaleli...

    ReplyDelete
    Replies
    1. Tumhala itihas vachaychi garaj aahe

      Delete
  26. Phadtus, garal oaknara lekh.

    ReplyDelete
  27. itihas ghadavnare fakt marathe nhavte , tyasathi itarahi jatintil shur mavlyanni tyanche rakt kharchi ghatle ahe ,
    tyamule kona eka jatinech svarajya sthapan kele ase mhanne he svatha Maharajanna suddha sahan zale nasate ,
    Svataha Maharajanni dekhil Anek tatkalin maratha rajanshi( svaghoshit) yuddha karun tyanna vathnivar anle hote .
    Svarajya sthapan karnyat tatkalin samajatil sarva tharantil jantecha sahabhag hota .
    Varil lekh mala patato ,pan mhanun sarva brahman samajach tasa hota kinva ahe ase samajne ha murkhapana hoil .
    Mi svataha Maratha samajatil ahe , tarihi mala ase vatte ki , varil lekh khara ahe ase apan manle tari , tyacha artha asa hot nahi ki vishishtha samaj ha maratha dveshi ahe .
    Ase karne mhanje samajat asleli duhi vadhavnyacha prayatna kelya sarkhe hoil.

    ReplyDelete
  28. Ho agdi barobar ahe shivaji rajanch khun karnyat aala ahe ani to brahama nanni kela aahe

    ReplyDelete
  29. namaskar...
    varati lihillela lekh vachla..yatlya kahi goshti kharya ahet ani kahi awastav khotya....
    .shivaji rajanvar jevanatun vish ghalnyacha prayatna kela gela...parantu jevan vadhalyanantar te vadhnarya vyaktine te adhi chakhun baghitle ki mg maharaj te khat asat mag vadhnari vyakti nokar aso wa bayko...ashi tya velechi rit hoti...tyababtit te konavarahi vishwas theu shakat nhavate...tyamule jevnat vish ghalnyache kam he gharatlya vyaktinech kele ahe,he sidhha hote...
    vish ghalnare brhamhan hote he sidhha hot nahi....
    annaji datto he maharajanche khup vishwasu hote..maharajani tyancha sathine khup chadhaya kelya ahet...
    annaji datto ni sambhaji maharajanmadhla dwesh ha gair samaja poti zala ahe...he janun ghenyasathi tumhi chhava kadambari vachu shakata....
    sambhaji raje he maharajanche jesht putra hote...soyara baina jenva mulga zala tenva tyancha manat ale ki apla muga raja ram chatrapati vhavet mhanaun tyani sambhaji maharajancha baddal manat adhi dharli....annaji ani sambhaji rajancha madhla gair sanaj vadhwun tyani annaji na tyancha virodhat ubhe kele....ani to virodh shevat paryant tasach rahila he durdaiv...
    sambhaji rajanche senapati kavi kulesh he brahmancha hote te sambhaji maharajan barobar tyancha mrutyu paryant tyancha barobar hote...tya doghana hi ekatra marnyat ale...he lakshat ghya......tyanche he hal aurang jebane kele...he tumhala mahit aselach....apla hinduncha shtru kon ahe he tumhich tharwa....
    brahmanani hi maharajana kayam sath ch dili ahe...kahi goshti ya gair samajatun ghadlya ahet....khara itihas tumhi shriman yogi ani chhava madhe vachu shakta...krupaya kontyahi afavana bali padu naka...varti lihilela lekh ha jati virodhakane ani kahi rajakiy lokancha madatitun vair paravanyasati kela ahe...



    miarjet zalelya dangali kuna mule zalya he tumhi ka baghat nahi....ANI kahihi itihas banvun he lok maharajancha apaman karat ahet...tari krupaya mazi vinanti ahe ki ase karu naka....yug purush shiv chatrpatina kay vatla asel....ki tyani evdha moth rajya ubh kela ani apan apaplyatch bhandtoy,,,kiti vait gosht ahe...manacha kholatun vichar kara mitrano....apan hindu aslyachi laaz vatel as kahi khot uthwu naka....maharajancha aadarsha dolya samor theva....ekjut wha...ani bola..
    GOWBRAHMAN PRATI PALAK ,KHYATRIYA KULAVTANSH,RAJADHIRAJ CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAY........CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJ KI JAY.....HINDU DHARAMA KI JAY......
    NA MARATHA NA BRAHMAN ...FAKT KATTAR HINDU...



    ReplyDelete
  30. प्रस्तुत लेखात बऱ्याच अंशी सत्यता मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला असे मला वाटते आणि प्रतिक्रियांमध्ये काही हिंदुत्ववादी मित्रांनी हा हिंदू धर्मियांतील एकता भंग करण्याचा प्रयत्न असल्याचे जे लिहिले आहे त्यांनी हिंदू या शब्दाची व्याख्या आर.एस.एस.च्या www.sanghparivar.org या साईट वर जाऊन पाहिल्यास बरे होईल आणि आणखी एक गोष्ट आणि ती म्हणजे त्यांनी ब्राम्हणी कावेबाजी आणि बनवाबनवीचे सगळ्यात मोठे उदाहरणच बघायचे असेल तर रामायण,महाभारत,श्रीमद भगवद्गीता,श्रीमदभागवत,ज्ञानेश्वरी,४ वेद,६ शास्त्र ,१८ पुराने आणि इतर सगळ्या पोथ्या यांमध्ये 'हिंदू'हा शब्द दाखवून द्यावा आणि नंतर हिंदू धर्म आणि हिंदुत्वाबद्दल बोलण्यासाठी आपले श्रीमुख उघडावे. अरे या ब्राम्हणांच्या सांगण्यावरून स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यात गर्व कसला मानता हिंदू हा अभिमानास्पद शब्द नसून ती एक शिवी आहे. पटत नसेल तर वर उल्लेख केलेल्या साईट ला भेट द्या माझ्या म्हणण्यावर विश्वास नसेल तर ब्राह्मानांचे तर खरे मानाल कि नाही ????????????

    ReplyDelete
    Replies
    1. साहेब मला वाटत मग तुम्ही महाराजां पेक्षा पण खुप हुशार असले पाहिजेत
      किंवा मग तुमच वाचन तरी नसल पाहिजे

      कारण
      महाराजानि मिर्जा राजाला लिहिलेल पत्र तुम्ही वचल नाही
      महाराजानि राज्याभिषेका नंतर लिहिलेल पत्र तुम्ही वाचाल नाही
      संभाजी राजानी हे हिन्दू राज्य आहे अस लिहिलेल पत्र तुम्ही वाचाल नाही

      ज़रा महाराजांचा पत्रव्यवहार वाचा
      आणि महाराजाना हिंदू ह्या शब्दा बद्दल काय वाटत होत ते एकदा पहा

      Delete
  31. khare kay ani khote kay he samjat nahi, pan bramhan he pahillya pasun kapti aahe........yat shanka nahi

    ReplyDelete
  32. सदरचा लेख लिहणा-याने आपले पूर्ण नाव व पत्ता तसेच शक्य असल्यास संपूर्ण माहिती (biodata) आणि फोन नं द्यावेत.
    ----------------मी मंदार बापट, आजरा. कोल्हापूर ४१६५०५, फोन - ९४२००९४१८०

    ReplyDelete
  33. khare satya kase samjel

    ReplyDelete
  34. chatrapati shivaji maharajachancha vijay aaso...
    jai bhawani jai shivaji

    namaskar jijau aaie..


    chatrapati shivaji maharaj, shahaji maharaj. aani sambhaji maharaj hote manun ha swarajya maratyancha hakkacha zala... aamhi kuthe he kase he firu shakato.. khelu shakato. he sarva jijau aaplya mule...
    aaplya putran mule...

    aamcha bhagya aahe ji aamhe tumcha mathith marathi manun jalmala aalo..

    pan tya bhadkhau bramhanani marathi maticha.. marathi manacha. marathi mulakhacha. marathi shabdacha vishavash ghat kela.


    bramhan samaja halakata pekshahe khalacha jaticha aahe ya samajyala bhar chawakat jamini madhe gadhun takale pahije....

    himmat hoti tar shivaji maharachancha chativar war karun dakhavayacha hota.. tayancha path pathi ka var kele... na mard hote bramhan manun pathun var kele...

    maratha aasala asata tar samorun var kele aasate....

    he shabda aasashathi hrudayatun baher yetat ki...aata aamhala shivaji, shahaji, shambu raje aani jijau.. ya havya aahet maharashtra poraka zala aahe yancha shivay......

    ReplyDelete
  35. Bramhan lokani ch ha Khun kelaa aahe

    ReplyDelete
  36. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  37. Ho agdi barobar ahe shivaji rajanch khun karnyat aala ahe ani to brahama nanni kela aahe. . .tyamulech Bramhnana bhadgule -madarchod mhntaat, aanni mhnat rahil. . . Jay Jijaau. . . .

    ReplyDelete
  38. FAKTA BRAMHAN DWESH DISTOY..

    ReplyDelete
  39. 2किंवा3 व्‍य‍क्‍तींच्‍या कामावरुन संपुर्ण जातीला दोषीधरण्‍यात कोणती वैचारीक प्रगल्‍बताआहे

    ReplyDelete
  40. या सगळ्याचा आधार तर्क आहे आणि याला तर्कट म्हणतात . इतिहासाचा असा अर्थ लाऊन वर्तमानात आपली पोळी भाजून घेणे हा महत्वाचा हेतू आहे अर्थात जनतेने हा स्वीकारलेला नाही भारतात दहा बारा टाळकी जमवून बहुमताचा देखावा करता येतो. महाराष्ट्रात जाती जातीत वैमनस्य पसरवून ७०% संपत्तीच्या केंद्रीकार्णावरून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा डाव आहे पण जनता फसणार नाही ७०% विरुद्ध ३०% या संघर्षाची सुरुवात झालेली आहे १० वर्षांनी पाहाल महाराष्ट पूर्ण बदलला असेल

    ReplyDelete
  41. तुम्हाला इतिहास लिहिण्यापासून कुणी थांबवलं होतं? ब्राह्मणांनी इतिहास लिहिला, तुम्ही का लिहिला नाहीत?
    परशुराम चव्हाण ब्राह्मण आहेत का?

    ब्लॉग चा विषय ब्राह्मण द्वेष आहे कि खुनाबद्दल माहिती देणे?

    इकडची माशी तिकडे गेली तरी ज्यांना कळायचे ते महाराज, त्यांना, आपल्या भोवती कपटी ब्राह्मण उभे आहेत हे ओळखू शकले नसतील का?

    महाराजांच्या नंतर अटकेपार झेंडे लावणारा बाजीराव ब्राह्मण नव्हता का? खून करायचा असता तर त्यानंतर छत्रपतींची सत्ता वाढवायला ब्राह्मणी वीर उभे का राहिले असते?

    तुम्ही कितीही अभ्यास केला असला तरी जातीय द्वेषाचा चष्मा लावून केला आहे. आणि लोक खात्री न करता असले चष्मे लावून फिरत आहेत.

    आता इथे उगाच जात - जात न करता हिंदू म्हणून एकत्र राहण्याची वेळ आली आहे पण तुमच्या सारख्यांमुळे हिंदवी स्वराज्य राहिल बाजूला, एक ना धड भारंभार चिंध्या झाल्यात.

    ReplyDelete
    Replies
    1. brahman dweshatun he keke le likhan ahe bar kahi itihas kar maharajanla rajput sisodiya gharanya che vansaj mantat to itihas khara manay cha ka?

      Delete
  42. The great followin king of MAratha...!!!

    ReplyDelete
  43. Anonymous aaplyala nemk kaay mhanaycha aahe..... aamhi arop tumhi nakal mhantaa tyanvar ghyava.. tyanna manatun kadhav... itihas visraava.... jat dharm 1 saman manun.... aani jyani tevhaa kaand kel.. te parat tyan.. karaa mhanav... aaj pan aapan tumhi mahntaa aahot tasach challa aahe .... yaat bramhannana vait mhanaycha vishay nahi kahi.. haa vishay aahe... zalelya ktas bali padlelyanna lokanchya najretun khara khura itihas Bavishyala kalava...

    ReplyDelete
  44. Maharaj Jante Raje Hote Gharat Grah Kalah Shakya Nahi!!!!!!!!!!!!!!!

    ReplyDelete
    Replies
    1. vishalsingh hya gosti var dhyan deu naka ...
      tya muslmanani aapla rana jaisigh yana mirza banvane hote ...aaple hindut fut padaychya prayant aajun sudha chalu aahe ....laksh dya hinduna sahkarya kara . to kontya hi samajacha aaso

      Delete
  45. mitrano mi saglya coment vachlya ...tyachya varun bhandu naka ......sadhya paristiti bikat aahe 1 jut raha yenara kal shatrucha aahe ....hirv sankat khup popalat aahe aaplya hindu mansala sahkarya kara......

    ReplyDelete
  46. V V wrong Interpretation of History... Please stop doing this. Shivaji Maharaj's death was natural death and it was proved because of many letters of British, Dutch, Mughal Bakhar. Its sad but true that Raje also faced "Family drama". Sambhaji raje was great no doubt but he lost his path during his early part of life but he came back and won great battles against Aurangzeb. Guyz dont do "Jaat paat" rajkaran on Shivaji Maharaj. He is gretest ever king of this country. Please come out of this and fight against what British and congress have done with our History. Both have written wrong history. Be together guys.

    ReplyDelete
  47. यावरुन आसे दिसते की मराठे ब्राम्हणामूळे देशो धडीला लागले आजुन हि छञपती शिवाजी महाराज आनि भगव्या चा आधार घेउन राज्य कर्ते बनले पन मराठ्यांच्या विकासासाठी काहि केले नाहि

    ReplyDelete
  48. महाराज्या बद्दल इतकी माहिती गोळा करुण योग्य प्रकारे पाठ पुरावा देउन जे आपण साध्य केले आहे आणि जी माहिती आपण योग्य पणे शहानिशा करुन दिली आहे त्या बद्दल आपले धन्यवाद

    ReplyDelete
  49. खरे काय आणि खोटे काय हे मला माहिती नाही पण पुढील पिढीला ह्याचा पासून कोणताही त्रास न होता चांगली माहिती द्या देणाऱ्यांनो कारण देव आहेत की नाहीत ह्याच्या वरून सुध्दा वाद आहे नेमके आमच्या पिढी ने काय मानावे ,मी तर पूर्ण गोंधळून गेलो आहे ,थोडक्यात शिव जयंती ३/४ साजरी करतो नेमकी खरी कोणती?

    ReplyDelete
    Replies
    1. varshache 365 divas jari shivjayanti sajari kelitati kamicha aahe karan shivajiraje hotech tase ekmewadvitiya....!

      Delete
  50. shivaji mharaj he kase hote he saglya samajala mahit aahe pan he je koni kat karstan kele tyana aj hi shiksha hoyla havi tyana swata tulajabhavani mata ne yudha karnya sathi talvar dil....... marthi mansathi khup dukhad ghatna aaahe .
    dev aahe mhanun manus aahe aani tyani saglyan sathi changle kele tya mule phudchya pidhila yacha tras kadhich honar nahi. aj garv vat to marathi honyacha pan amchya rajyana nya bhetayla hava .

    ReplyDelete
  51. Maharajancha khuun zala he tr Satya ahech pn ya karat bramhan ani soyarabayihi shamil hotya tasech shambhu mharajanvr sudhha yannich vishprayog kela

    ReplyDelete
    Replies
    1. संभाजी महाराज यांवर ब्रह्मान ने विष प्रयोग केला

      Delete
    2. गांजा ओढुन माहिती दिली आहे का तुम्ही

      Delete
  52. एक प्रश्न पडतो की जर सोयराबाई यात नव्हत्या तर मग त्यांनी विष का घेतले?????

    ReplyDelete
  53. वरील संदर्भावरून एकच गोष्ट सिध्द होते कि,
    महाराजांचा सत्तेसाठीच खून केला गेला.

    ReplyDelete
  54. वरील संदर्भावरून एकच गोष्ट सिध्द होते कि,
    महाराजांचा सत्तेसाठीच खून केला गेला.

    ReplyDelete
  55. मला वाटत हे फ़क्त हां लेख लिलेल्या लेखकाचे निष्कर्ष आहेत आणि ते संपूर्ण बालिश आहेत
    वरील कोणत्याही पत्रा मधे शिवभारत,सभासद बखर,शकावली किंवा इतरही कुठे महाराजांच्या मृत्यु बद्दल संशय व्यक्त केलेला नाही
    असे जर निष्कर्ष काढायाचे तर कोणीही काहीही काढू शकतो
    महाराजांचा खून करयाचा असता तर ब्राम्हणाना 100 संधि मिळाल्या असत्य
    पहिली संधि कुष्णजीपंत बोकिल याने जर अफजल खानाला महाराजांचा प्लान सांगितला असता आणि विषय संपला असता
    दूसरी संधी बाजीप्रभु देशपांडे यानी पावनखिंड लढवन्या ऐवजी सिद्धि जौहर ला सामिल झाला असता तर महाराज फ़क्त 600 मावळ्या सहित जौहर ला सापडले असते

    शाहिस्ते खाना वर छापा घालायचा प्लान जर ब्राम्हण मंत्र्याने लिक केला असता तर महाराज सवा लाखाच्या फ़ौजेत फक्त 1000 मावळ्या च्या सहित सापडले असते

    सूरते वर चाल करायची बातमी जर कोणी लिक करत तर महाराज स्वराज्य पासून एवढ्या लांब फ़क्त 5000 फौजे सकट पकडले गेले असते

    आग्रा वरुण सुटका करताना जर एक जरी ब्राम्हण फितूर झाला असता तर महाराज आणि संभाजी राजे कधीच परत स्वराज्यात आले नसते

    आग्रा वरुण सुटके वेळी संभाजी राजांना ज्या ब्राम्हणाच्या घरी ठेवल होत तो जर संभाजी राजांना औरंगजेबा च्या हवाली करतो तर किती सोप्प् काम होत त्यांच्या साठी

    उगाच हे नाही ते मनाचे निष्कर्ष काढू नका
    कारण ज्याने इतिहास वाचला आहे तो तुमच्या बालिश लिखानाला कधीच फसनार नाही

    मात्र ज्याणी चौथी च्या पुस्तका नंतर कधी महाराजांच्या इतिहासा कड़े पाहिला सुधा नाही आशा लोकांना तुमचे विचार नक्की पटतील

    ReplyDelete
    Replies
    1. भानुदास रावडे हा घबराट नेभळट आणि विकृत आहे स्वतःचे खरे नाव पण सांगू शकत नाही. .... एखाद्याने पत्ता दिला असता व म्हणाला असता या घरी चर्चा करू.......

      Delete
  56. काही ब्राम्हन चांगले होते तर काहि वाइट.
    पण आपले खरे शत्रू कोण आहेत ते बघा.
    हींदू धर्म नष्ट कोण करत होत.?
    शिवाजी महाराज हे कोणत्या जाती साठी लढत नव्हते तर पुर्ण हिंदू साठी लढत होते.
    भारतामधे खूप जाती पाडल्यामूळे आणि हेच खूप मोठे संकट आहे हे शिवाजी महाराजांनी ओळखले आणि सर्व जाती धर्माचे लोक एकत्र व्हावे म्हणून हिंदू हे एक नाव.
    आणि म्हणूनच ज्ञानेश्वरी, ४ वेद इ. यामधे हिंदू या शब्दाचा उल्लेख नाहिये.
    हिंदू हि ब्राम्हणांनी दिलेली शिवी नव्हे.

    ReplyDelete
  57. धन्यवाद...आता ही ब्रह्माम हे कपटी मनाचे आहेत आता खरा इतिहास कळला जय शिवराय आणि संत तुकारामना मारणारे पण ब्राह्मण च होते ना स्वराज्याचा केसांनि गला कापाल

    ReplyDelete
    Replies
    1. केवळ दुसऱ्या ला दोष दिला की सांपला का विषय..???
      ह्यांची पण काम पहा ज़रा महाराजाना कसा विरोध केला ते
      कृष्णजी बांदल( रायरेश्वर घेताना विरोध)
      खंडोजी खोपडे अफजल खानाला सामिल
      मंबाजी भोसले अफजल खाना ला सामिल
      बाबाजी निंबाळकर महाराजांचे जावई मुगलांचे नोकर
      बाजी घोरपडे शाहजी राजांना अटक करणारे
      राजे सावंत आणि सुर्वे पावनखिंडी वेळी महाजाना विशालगडा वर जान्या पासून रोखनारे

      गनोजि शिर्के संभाजी राजांना पकडून देणारे

      जावळि चे मोरे माहीत आहेत का..??

      एवढी लिस्ट बास का अजुन ही देऊ
      यात महाराजांचे नातेवाईक पण आहेत अजुन

      बामना ला शिव्या देन्या पूर्वी स्वता कड़े पण पहा ज़रा

      Delete
  58. हां निव्वळ ब्राम्हण द्वेष पसरवन्या चा प्रकार आहे बाकी काही नाही

    लेखक जर सुज्ञ आणि आभ्यासु असते तर
    महाराजानि मिर्जाराजला लिहिलेल पत्र वाचल असत
    माहाराजांच राज्याभिषेका नंतर च सामान्य रयतेला लिहिलेल आज्ञापत्र वाचल असत तर
    हे असले फुटकळ निष्कर्ष काढले नसते

    कोणीही उठातो आणि काही पण लिहितो
    कोणी बोलतो की महाराजांचा खून झाला आणि तो महाराजांनी नेमलेल्या अष्टप्रधान मंडळा मधल्या लोकांनी केला
    म्हणजे महाराजांच्या निणर्यक्षमते वर निवडीवर ह्यांनी शंका घेतली आहे हे पण यांच्या लक्षात येईना
    जी गोष्ट महाराजाना समजली नाही ती गोष्ट याना समजली म्हणजे लेखक बहुतेक महाराजां पेक्षा ही जास्त हुशार असावेत

    कोणी बोलतो तुकाराम महाराजांचा खून झाला
    म्हणजे पुण्या पासून हाके च्या अंतरा वर एवढ्या मोठ्या संताचा खून होतो आणि महाराजाना ती गोष्ट समजत नाही..???

    म्हणजे महाराजांच्या हेर खात्या वर घेतलेली ही शंका आहे..!!!

    जिथे सूरत दिल्ली वीजापुर ह्या ठिकाणची खड़ा आणि खड़ा माहिती महाराजाना असायची तर देहु किती लांब आहे..??
    कोणाचा अपमान करता आहात तुम्ही..???

    बन्द करा हां पोरकटपना

    ReplyDelete
  59. मुद्दा पहिला
    कोणताही मराठा स्वताच्या मुलाच नाव अफजल ठेवल का..??

    तसच महाराजांच्या पत्नी सोयरा बाईसाहेब यांच्या नंतर ह्या मराठी माणसाने आपल्या कोणत्याही मुलीच नाव सोयरा ठेवल नाही

    अस का झाल असेल..???
    याचा कोणी विचार करेल का

    कोणी ऐकल आहे का आपल्या आजी किंवा पंजी च किंवा कोणाचाहि नाव सोयरा बाई होत अस

    ReplyDelete
    Replies
    1. Kontyahi brahmnacha naav Shivaji aahe ka?

      Delete
    2. Kontyahi brahmnacha naav Shivaji aahe ka?

      Delete
    3. google करा भरपूर आहेत

      Delete
  60. दूसरा मुद्दा

    सोयराबाई साहेब ह्या स्वराज्याच्या महाराणी होत्या त्यांच्या शब्दाला महाराजांच्या खालो खाल मान होता

    तर्कच् लावायचा तर मग असा पण लाऊ शकता लेखक महाशय की
    सोयरा बाईसाहेबानी ब्राम्हण मंत्री आणि संभाजीराजे यांच्यात भांडण लावली कारण त्यांचा मुलगा राजाराम याना गादी वर बसवायच होत

    ReplyDelete
    Replies
    1. ए भडव्या काही पुरावा आहे का कि कोणत्यातरी भटाच्या बखरीतील ओकतो इथे गांडु. ब्राह्मण मंत्री भ्रष्टाचार करत होते म्हणून संभाजीराजांनी मंत्र्यांना विरोध केला होता त्यात सोयराबाईसाहेब कुठून आल्या रे कोल्ह्याची जमात भाडखाऊ

      Delete
  61. मुद्दा 3

    राजाराम महाराजानि संभाजी राजांना कैद झाल्या नंतर अवघ्या 6 दिवसात राज्याभिषेक करुण घेतला तो का..??

    स्वराज्याचे छत्रपति संभाजी राजे फ़क्त कैद झाले होते
    पण जिवंत होते
    मग संभाजी राजे जिवंत असताना राज्याभिषेक कसा झाला

    बर केला राज्याभिषेक काही हरकत नाही
    मग संभाजी राजांना सोडवन्या साठी एक तरी प्रयत्न केल्याची माहिती सांगा
    कुठे सैनिकी हालचाल झाली का सांगा..??
    आता जर राजाराम महाराज छत्रपति झाले होते
    सर्व अधिकार त्याना आले होते तर मग संभाजी राजांना सोडवन्याचे औरंगजेबा बरोबर काही तह किंवा बोलनी केल्याचा पुरावा दाखवा

    उलट राजाराम महाराजानि राज्याभिषेक झाल्या नंतर दुसऱ्या दिवशी येसाजि आणि सिदोजी फर्जन्द या संभाजी राजांच्या अतिशय जवळ च्या लोकांचा कडेलोट केला तो का..???

    ReplyDelete
  62. लेखक भांग पिऊन लिहियाला बसले होते असा अर्थ मला निघटो आहे

    ज़रा बुद्धि वापरा साहेब काय लिहावे आणि ह्या लहान लहान मुलांची माथि कशी भडकवावि याला काही तरी सीमा आहे का नाही

    चला मी तुम्हाला चैलेंज देतो ज्याणी प्रतिक्रया दिल्या आहेत त्यानी स्वता च्या मनाला एकदा विचारा
    तुम्ही काय वचल आहे हो..???
    शिवकालीन पत्रव्यवहार वाचला आहे का..??
    शिवभारत वाचाल आहे का..??
    जेधे शकावली वाचली आहे का..??
    जेधे करीना वाचाल आहे का..??
    सभासद बखर वाचली आहे का..??


    अरे मग वाचाल काय चौथी च पुस्तक वाचाल का..??

    कोणाच्या नादी लागता

    ज्याने लेख लिहिला ती व्यक्ति कोण आहे त्यांचा आभ्यास काय आहे
    त्यांची योग्यता आहे का

    त्यानी हे सगळे फ़क्त निष्कर्ष काढले आहेत
    हे तुम्हाला समजल का..??

    निष्कर्ष कोणी ही काहीही काढू शकतो
    पण लेखकाने तुम्हाला एक तरी पुरावा असा दिला का की
    शिवभारत मधे अस लिहिल आहे....!!
    शकावली मधे असा उल्लेख आला..!!!
    सभासद बखर मधे अस सांगिताल आहे...!!!

    अरे मग महाराजांचा खून झाला अस लिहिल कुठे आहे..??

    तर ते फ़क्त ह्या लेखक महाशयानी लिहिल आहे
    आणि फ़क्त त्याना तस वाटत म्हणून त्यानी लिहिल

    बाकी काही नाही

    उद्या मी 20 रुपया ची भांग पियालो की मी पण काही लिहु शकतो

    आणि तुम्ही काय ह्या लेखकांच्या नादी लागला आहात..???
    अरे असे लेखक महाराजांच्या दरबारा मधे चोपदार पण ठेवले नसते महाराजांनी

    कवी परमानंद कुठे
    कवी भूषण कुठे
    ह्यांना वाचा कारण हे कवी आणि लेखक त्याकाळी दरबारा मधे उपस्तित होते
    महाराजांच्या समोर उभे होते

    आणि हां लेख ज्याणी लिहिला ते कुठे होते सांगा मला..,????

    ReplyDelete
    Replies
    1. या सगळ्या बखरी चरित्र पण ब्राम्हणांनी लिहलाय ना

      Delete
  63. agadi barobar Bhanudasji

    ReplyDelete
  64. हजारो वर्षांची ब्राम्हण दादागिरी आणि सत्ता कसली हो..??
    चालुक्य
    शीलहार
    यादव वंश 396 वर्ष
    1303 साली यादवांची सत्ता गेली आणि यवनांची सत्ता आली
    ती अगदी महाराजांनी स्वराज्य स्थापन करे पर्यंत
    मग ह्या ठिकाणी आपले पराक्रमी सरदार जिथे यवनाना मुजरे करत होते त्याठिकानि ब्राम्हणाची कसली हो दादागिरी चालणार...??
    तुमचा धर्मच ज्या यवनाना मान्य नाही तिथे ब्राम्हणांची काय दादागिरी हो साहेब

    आपली मंदिर फोडली
    मुर्त्या नाहीशा केल्या
    बायका पळवून नेल्या
    लोकांच् जबरदस्ती धर्मान्तर केल आशा वेळी बामनांची दादागिरी

    ReplyDelete
    Replies
    1. ए भटुकड्या तुझी चमचेगिरी तुझ्यापाशीच ठेव. सगळा इतिहास माहित आहे.लबाड वाणीच्या कोल्ह्या कितीही बरळलास तरी फरक पडणार नाही

      Delete
    2. Bhanudas..tuzya kad purava ahe ka ?? Tu majetel sarkha bolto mharajnna kalat nahi ka assa ?? Tuzi layki nahi a pora jagnyachi ?? Akhand maharashtrat tumhi jagle na te kapat karasthan karun jagle...yapalikad tumhala kahi yet pan nahi...bhasha nit vaparyavhi nahitr amhi bolayla laglo na tr shendi pan nahi rahanar..tar aata pudhe tond sambhalun bol

      Delete
  65. आणि आम्हाला ह्या लेखा मधे सारखे सारखे
    शिवभारत, जेधे शकावली, सभासद बखर याचे दाखले देता आहात

    आता सांगा मला ज़रा
    शिवभारत हे कवी परमानंदानी लिहिल आहे
    कवी परमानंद महाराजांच्या दरबारात महाराजां सोबत असणारे राज कवी आहेत
    कुठे उल्लेख आहे शिवभारत मधे महाराजांचा खून झाला असा..??
    जेधे शकावली ही जेधे घराने हे कारी चे तालुका भोर इथले देशमुख आहेत ह्या शकावली मधे महाराजांच्या जन्माची आणि त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक महत्वाच्या घटनेची नोंद आहे
    त्यांच्या मृत्यूची पण नोंद आहे
    कुठे लिहिल आहे शकावली मधे की महाराजांचा खून झाला..???

    सभासद बखर ही स्वता राजाराम महाराजानि सभासदा कडून लिहून घेतली
    त्याच्या कड़े सभासद हे पद महाराजांच्या काळा पासून चालत आल आहे
    ह्या सभासदाने शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजाराम महाराज अस सगळ्यांना पाहिल आहे त्यांच्या दरबारी काम केल आहे
    सांगा आता सभासद बखर मधे कुठे उल्लेख आला आहे की महाराजांचा खून झाला..???

    तुम्ही
    इंग्रज
    पारसी
    मनूची
    आणि डच यांच्या पत्राचे दाखले देता आहात
    मला सांगा एक डच पत्र सोडल तर कोण बोलतो आहे की विष्प्रयोग झाला..???

    ह्या सगळ्यांना रायगडा वर काय चालल आहे हे समजायला यांचे हेर खात एवढं मोठ होत का..??

    आणि जर मग
    ह्या सगळ्या परकीय लोकांची पत्र सत्य मानायची तर मग ह्या लोकांनी संभाजी महाराजां बद्दल काय काय मत नोंदवाली आहेत ती सगळी जशी च्या तशी खरी मानायची का..??

    तुम्ही बोलता कारस्थान करणारा घटने पासून नेहमी लांब राहतो
    मग उद्या एखादा दीड शहाना उठल आणि तुम्ही लिहिलेल्या लेखाचा संदर्भ घेऊन
    हंबीरराव आणि संभाजी राजे पण घटानास्थळा पासून लांब होते अस सांगेल

    हां इतिहास आहे साहेब ईथे तर्का ला जागा नाही
    ईथे लिखित पुरावा दाखवायचा तो पुरावा बाकीच्या पुराव्यां सोबत तपासून पहायचा आणि मग तो सत्य असेल तर लोकां समोर मांडायचा
    याला बोलतात इतिहास लिहिने

    मला अस वाटत हे लिहिन याला इतिहास लिहिन अस नाही बोलत
    पुरावे दाखावा आणि मग बोला
    कुठे लिहिल आहे ते सांगा आणि मग बोला

    ReplyDelete
  66. Bhanudasji chan vishleshan kelat tumche karya asech chalu theva...

    ReplyDelete
  67. एकदम बरोबर ब्लॉग !

    ReplyDelete
  68. Saheb amchi pahili pidhi shikali, gharacha paper suddha dararoj na vacghanare amhi pana tumche sarv comments avadine vachale.. Hatachi pachahi bote sarkhi nasatat tyapraman sarv samajat changale vait lok astat..amuk ek samaj vait ase manat thevunach mat jar banaval tar hya deshat ek nava nazivad janmala yevu shakto ani tyacha parinam jarmani ani japanla kay bjogave logale he vegale sangayla nako. Shivaji maharajana raje na mananari maratha mandali hoti..dusari gosht mhanje te swatahla raje mananari lok hoti ani dattesathi don sattan madhe sangharsh tar honarch. Tisari gosht mhanje hi mandali rajanche chakarila nawhati tyamule tyani dagabaji keli vishwasghat kela ase mhanata yenar nahi. Ata anaaji datto vagaire mandalinch swarajyasathi yogdan asal tari shivaji rajanvar jhalelya vish prayogaveli zalelya ghatanakram pahata tyanchyavar sanshay utpann hoto.. Tyamule sampurn brahman lokana dosh deta yet nasala tari manusmruti madhil kayade, asprushatta, shikshanacha ittar jatit adhikar n dene hi brahmananchi den ahe he visarta hi kama naye..navin badal sarv samajane svikarle asale tari kahi kadve manuvadyana te punha ladayache ahet he pan tevadhech khare ahe.. Samajat badal karne he eka samajache daitv nasun sarv jatini ekatra yevun te kam karave.. Beti roticha vyavahar bamanani hi suru karava ani tase samaj prabodhan karave karan aaj hi tya samajavar itar jatichi mandali vishvas thevatat..

    ReplyDelete
  69. Apalyala nehmi sangital jat ya deshat britishani toda Foda ani rajya kel.. 1.5 lakh britishani 30 Cr bhartiyanvar rajya kele ha itihas sangato.. Jar apalya samajat eki asati tar toda fodach rajkaran karata aal asat ka.. Samaj jatin madhe vibhagala nasata tar britishana desh jinkata aala asta ka.. Bharatatil kshatrjy samajatahi asankhya jati nasatya tari britishana deshat rajya karata aal asta ka.. Itihas sangato ki bharatiy sattadhish videshi sattan pidhe kadhi hi tikali nahi.. Agadi ramayan mahabharata pasun cha itihas tapasun paha.. Hindunchi ji kahi kayade karnare pith hoti jyanche mukhya shankarachyarya astat tyani sarv hinduna ekatra ananyacha prayatn ka kela nahi.. Dr. Babasahebana hindu dharm ka sodala.. Ek lakshat ghya dr. Babasahebani jar Muslim dharm swikarla asta tar 50% loksankhya aaj muslim asti.. Maza virodh muslim dharmala nahi..ani maze aradhya shivarayani sarv dharmacha adar karayalach shikawale ahe pan jya brahman samajakade tya kalche sarv hindu aadarane ani asheni pahayache , lahan brahman balakala sudha 100 varshachi thor mandali brahman devata mhanun paya padayachi..parantu shrethatv tikavanyachya nadat sampurn hindu dharmachya hrasala karanibhut tharali..jagat sarvatra pasarlela hindu dharm aaj faqt bharatamadhe tikun ahe karan chatrapati shivaji maharajanmule.. Ajunhi vel geli nahi samajachi dishabhul karanyache prakar thambava deshach ani samajach bhal hoil..

    ReplyDelete
  70. Nivval faltu pana ani fukatcha brahman dweste pana mala sanga 3 chatrapatina aplya mantrimandalat, raj mandalat brahman ka lagayche ? ani nantar ekahi chatrapaticha nav zala nahi kartutva nahi, fakta peshvyani 7,8 pidhya bharatacha itihas gajavla ase kaaaaa

    ReplyDelete
  71. Mulat maratha hi jatach nahi maharastrat rahto to maratha, baki jati mhanje, kshatriya, kunbi etc. Tasech brahman hi suddha jat nahi, brahma janto to brahman, ti ek digree ahe, tasech hindu ha dharma nasun ti sanskruti ahe, walya koli walmiki zaala mhanje brahman zala pan pudhe kay,zala

    ReplyDelete
  72. Kaustubh saheb barobar bolat ahat..purvi jaat kontich nawhati..nirman kartyane manushya banawala..manushyachya karmanusar kalantarane jati padalya..Ani kahi jati tyanchyakade asalelya adhikaran mule shreshthtv dakhavu lagalya..tyamue itihas asha anek udaharnani bharalela ahe jyachi kahi udaharane tumhi dilit.. Khara to ek chi dharm jagala prem arpave..je kahi chukicb zaal tya baddal atta bhandun kay upayog ahe..tyamule ek mekanchi dokich futatil.. Ani ha asa chukicha adarsh apan pudhachya pidhila denar ahot ka.. Jati dharma khali zalelya dangalit kontyahi jati dharmacha dev konala vachavayala yeto ka...? Ugachach dharm ani jati varun bhutkalat zalelya chukanpasun ek adarsh ghya ani jati dharm nasht karun manuski navacha dharm rujavanyasathi prayatn kara..ajun khup prashn samajik prashn sutayache ahet nako tya thikani vaad ghalun shakti kashala vaya ghalata..

    ReplyDelete
  73. yevdhe vachun lakshat ala ahe ki bhanudas rawade ha purn vedha zhala ahe yala bedyaa thoka murkh yala zhop nahi lagnar ata asa disat ahe

    ReplyDelete
  74. एकदम बरोबर ब्लॉग !

    शरीरातुन जीव गेला तरी चालेल
    पण
    मनातुन शिवाजी महाराज जाऊ देणार नाही..

    *हातात तुझ्या पुर्वजांची राख मराठा,*
    *दिल्लीच्या तख्तालाही तुझा धाक मराठा,*
    *फोडुन डरकाळी जगाला सांग मराठा,*
    *तू एकला नव्हे..*
    *तू एक मराठा, लाख मराठा*
    ‪#‎ताकद_तुमच्या_नावात‬‪#‎आहे_राजे‬..‪#‎नाव_घेतल_की_रक्त_सळसळत‬..

    !!‪#‎‪#‎ताकद_तुमच्या_नावात‬‪#‎आहे_राजे‬..‪#‎नाव_घेतल_की_रक्त_सळसळत‬.. !!‪#‎चार_चौघात_जय_शिवराय‬‪#‎म्हणून_बघा_कोणा_कोणाला‬‪#‎मिर्ची_लागली_ते_लगेच_कळत‬..!!‪

    #‎आले_किती_गेले_किती‬‪#‎उडून_गेला_भरारा‬..‪#‎संपला_नाही_आणि‬‪#‎संपनार_ही_नाही‬..��������������‪#‎माझ्या_शिवरायाचा_दरारा‬..!!

    ��अपनी# जिंदगी का 1 वसूल है#
    #जिसको शिवबा #से प्यार नही

    वो भडवा अपना #यार नही����������
    ����जगदंब����

    8600696396
    maza mobile no. jyala maharajanvishayi shanka asel tyane call karava..... Tayarach ahe.

    ReplyDelete
  75. धन्यवाद सर्व इतिहासकाराना।।आपले मोलाचे लेख मनापासून आणि उत्साहाने वाचले।।।खुप आनंद वाटला आपण हिन्दू धर्माला एकत्रित आनन्यासाठी खुप मेहनत घेताय।याचाच फायदा घेउद्या बाहेरच्या समाजाला।।।अशीच एकी दाखवा आपल्यातील,म्हणजेच अपल्यावरती येऊ दया पुनः मुस्लिम आणि ब्रिटिशांचे साम्राज्य।।।
    जय हिन्द।।

    ReplyDelete
  76. धन्यवाद सर्व इतिहासकाराना।।आपले मोलाचे लेख मनापासून आणि उत्साहाने वाचले।।।खुप आनंद वाटला आपण हिन्दू धर्माला एकत्रित आनन्यासाठी खुप मेहनत घेताय।याचाच फायदा घेउद्या बाहेरच्या समाजाला।।।अशीच एकी दाखवा आपल्यातील,म्हणजेच अपल्यावरती येऊ दया पुनः मुस्लिम आणि ब्रिटिशांचे साम्राज्य।।।
    जय हिन्द।।

    ReplyDelete
  77. Itihas khara khota te rahudya pan mala ek Kalat nahi ki mi aajvar jitke pan controversial lekh vachley kinva books vachley te eka visist jatila uddeshun aahet aani eka visist jatichya lokanni lehale aahet......lok ekhdyala uddeshun n Bolta jatila point out kartat..aani tyachya jatichya babtit matr koni bolu pn shakat nhi..sangaycha hetu haach ki jaat vait naste manus asto...aata tari purogami vichar soda....

    ReplyDelete
    Replies
    1. saheb mla aaplyala betaychi o bolnyachi echhya aahe ....
      na-8888805052 ha maza numbr aahe ..tumche contyact kaasel tar mla plz patva...

      Delete
  78. namaskar mi akash koli
    ....jay bhavani jay shivaji ....
    aaplya ya mahiticha aanbhav aami 26/11 chya hlya madhe dekhil ghetla aahe ....
    pan aaplya lokana aajun tyachi janiv jali nahi. he ya maharashtrache tasech shivrayanchye durdev samjave lagel .
    karan aami aajun hi jo koni ekadhya dramachya logani sagtil te khate samjun pude chalo aahe .
    21 vya shatkathi aaplya devteche mhanjech maharajanchya navach vagar karun rajkarn kele jate .....
    kote tari he badle pahije .aani yachi survat aapn karuya ..
    ani aaplya shivaji maharaj aani sambhaji maharajance balidan verth na jau deta tyanchya manatil aajcha maharashtra banu ya...
    jay maharashtra

    ReplyDelete
  79. namaskar mi akash koli
    ....jay bhavani jay shivaji ....
    aaplya ya mahiticha aanbhav aami 26/11 chya hlya madhe dekhil ghetla aahe ....
    pan aaplya lokana aajun tyachi janiv jali nahi. he ya maharashtrache tasech shivrayanchye durdev samjave lagel .
    karan aami aajun hi jo koni ekadhya dramachya logani sagtil te khate samjun pude chalo aahe .
    21 vya shatkathi aaplya devteche mhanjech maharajanchya navach vagar karun rajkarn kele jate .....
    kote tari he badle pahije .aani yachi survat aapn karuya ..
    ani aaplya shivaji maharaj aani sambhaji maharajance balidan verth na jau deta tyanchya manatil aajcha maharashtra banu ya...
    jay maharashtra

    ReplyDelete
  80. फोडा आणी राज्य करा ही नीती इंग्रजांनी वापरली. ब्राह्मण मराठ्यांमधे द्वेष पसरवणार्यापासून सावधान.

    ReplyDelete
  81. ब्राम्हण मराठ्ंयाचे भांडण, कुत्र्यांचा लाभ.

    ReplyDelete
  82. Swatala sarvoch mannari hi jat ,khrokhrch manat santap aanarya ya ghatna aahet aani ha blog wachla tr ek spast hote ki maharajancha khun ch jhala asawa ,aani he lok tashich aahet kut budhiche ,yani maharajanchi samadhi bandhtana hi swatachi ghanerdi bhudhi waprli ,yana marathi jaticha raja nko yana baherun aalele moghal chaltat ,yawrunch klt ki he kiti khalchya tharache aahet ,saty kdhi lpt nahi he ya ghanerdya lokana klt nsav ,khr tr yana he kalay haway ki maharaj hote mhnun hindu ha dharm aahe ajun.

    ReplyDelete
  83. Sarvana shahanepana shikavinari hi jaat swarajyacha nehmich vait chintan karat aali aahe . Ek wel swarajyatlya musalmanani daga nahi kela parantu Brahman nehmich daga karat rahile aahet .Aata suddha Maharashtra var peshwai suru aahe

    ReplyDelete
  84. Saglyanchi mata vachali pan maaza asa prashna aahe ki kuthachi stree aaplya navryala marnchya katata samil honar nahi ani tya kalata tar nalkich nahi soyrabai innocent hotya pan mag sambhaji mahrajana atak jhlyavar marthyani kahich kashi halchal kali nahi karan ja marathe shivji ani sambhaji rajram mahrajananatre hi tyani swarjycha deeva vijhu dila nahi ta sambhji mahrajana sodabnyasathi kahicha karu shakle nahit ashrya aahe khup goshti saushyaspad aahet

    ReplyDelete
  85. Saglyanchi mata vachali pan maaza asa prashna aahe ki kuthachi stree aaplya navryala marnchya katata samil honar nahi ani tya kalata tar nalkich nahi soyrabai innocent hotya pan mag sambhaji mahrajana atak jhlyavar marthyani kahich kashi halchal kali nahi karan ja marathe shivji ani sambhaji rajram mahrajananatre hi tyani swarjycha deeva vijhu dila nahi ta sambhji mahrajana sodabnyasathi kahicha karu shakle nahit ashrya aahe khup goshti saushyaspad aahet

    ReplyDelete
  86. Saglyanchi mata vachali pan maaza asa prashna aahe ki kuthachi stree aaplya navryala marnchya katata samil honar nahi ani tya kalata tar nalkich nahi soyrabai innocent hotya pan mag sambhaji mahrajana atak jhlyavar marthyani kahich kashi halchal kali nahi karan ja marathe shivji ani sambhaji rajram mahrajananatre hi tyani swarjycha deeva vijhu dila nahi ta sambhji mahrajana sodabnyasathi kahicha karu shakle nahit ashrya aahe khup goshti saushyaspad aahet

    ReplyDelete
  87. Saglyanchi mata vachali pan maaza asa prashna aahe ki kuthachi stree aaplya navryala marnchya katata samil honar nahi ani tya kalata tar nalkich nahi soyrabai innocent hotya pan mag sambhaji mahrajana atak jhlyavar marthyani kahich kashi halchal kali nahi karan ja marathe shivji ani sambhaji rajram mahrajananatre hi tyani swarjycha deeva vijhu dila nahi ta sambhji mahrajana sodabnyasathi kahicha karu shakle nahit ashrya aahe khup goshti saushyaspad aahet

    ReplyDelete
  88. पूर्ण वाचून अत्यंत आनंद होत आहे की शिवाजी महाराज चा खून कसा व का झाला हे आज स्पष्ट कळले. आणि हे भ्राम्हण लोक किती घृण कृत्य करू शकतात याची ही जाणीव झाली. पूर्ण वाचुन हे नक्कीच स्पष्ट आणि सिद्ध होते की भ्रम्हण यानीच शिवाजी महाराजाचा खुनाचा कट रचला आणि महाराजांवर विषप्रयोग करुण त्यांचा खून केला. स्वत वर आरोप होउ नये म्हणून ह्या भ्रम्हण लोकानी सोयराबाई वर आरोप लावला आणि हे भ्राम्हण लोक खोटी अफवा पसरवत राहिले. हे भ्राम्हण लोक किती खोटे असतात हे आज कळले. अश्या भ्राम्हण लोकाना तर खुप मोठी शिक्षा झाली पाहिजे.

    ReplyDelete
  89. Kela khun, mag aata kay?

    ReplyDelete
    Replies
    1. Naav lihayla ghabrla bc...nav lih mag sangto khunacha badla kasa gheu te

      Delete
  90. Varil majkur wachun he lakshyat yete ki shivarayancha mrutyu zala nasun tyanchya hatyecha kat rachanyat ala hota.kahi bramhan jatiche lakani shivarayanvar vish prayog kela hota . sarv wachun ek gosht lakshyat ali ki ha majkur lihinaryane kaljine lihila...

    ReplyDelete
  91. Bramhan samajala kalankit karnarya tya aani aashyach lokanna aamhi kadhihi maf karu shaknar nahi.ha lekh vachun ase laksht yete ki Bramhanachya veshat rakshas hota annaji datto.kinva tyapekshahi nich hota.

    ReplyDelete
  92. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  93. Maharajancha khun Brahman lokanni kela he tar siddha hot nahich pan ganoji shirke ne sambhaji rajanna futurI ne marun swarajyat mogal ghusavle..hi jat kuthli..brahmanetar lekhakanni suddha ji,pustake lihili tyatahi brahmanetar sapachya auladi kami navhtya.. Maharajanchya gharich bhosale parivaratil swarajyachya viruddha hote. Bakhari tar baryach aahet mag konti khari hyala purava kay?

    ReplyDelete
  94. Bhraman he ingrajasarkhe ka distat ?

    ReplyDelete
  95. पन एक खरे आहे महाराजांचे आयुष्य दुप्पट असते तर कोणतेही वाद झाले नसते.

    ReplyDelete
  96. Just finished "Shriman Yogi". your blog did cleared many doubts. Thank you for the information and the facts.

    Now I'm interested in knowing more about Sambhaji.

    Which novel to read on Sambhaji ?
    Sambhaji by Vishwas Patil


    or

    Chhava by Shivaji Sawant

    please reply soon

    Thank you

    ReplyDelete
  97. .......शिवाजीस विष देऊन ठार मारले असे संभाजीस वाटत असावे.

    अण्णाजी पंडित, केशव पंडित, प्रल्हाद पंडित वगैरेंनी कट करून पोटात विष भरलेली मासळी संभाजीच्या ताटात वाढली. हे एका मुलाने संभाजीस सांगितल्यामुळे कट उघडकीस आला. ती मासळी खाल्यामुळे एक कुत्रा आणि एक मुलगा दोघेही मरण पावले (३० ऑग. १६८१). संभाजी खवळला, त्याने विष देणाऱ्या सोयराबाई, बालाजी प्रभू, अण्णाजी दत्तो, सोमाजी दत्तो आणि हिरोजी फर्जद वगैरेंना व त्यांच्या २० साथीदारांस हत्तीच्या पायी तुडविले, (१२ ऑक्टो.१६८१) याच लोकांनी शिवाजी महाराज लवकर मरावे म्हणून सोयराबाईंच्या मदतीने शिवाजीस विष देऊन ठार मारले असे संभाजीस वाटत असावे. शिवाजींचे प्राणोत्क्रमण झाले त्यावेळी पेशवा मोरोपंत पिंगळे व अण्णाजी दत्तो हे अधिकारी त्यांच्याजवळ नव्हते. पण विष देण्याची त्यांना सवय होती हे संभाजीच्या प्रकरणावरून सिद्ध होते. ह्या सर्वांना संभाजी अप्रिय असल्यामुळे त्यांनी संभाजीस स्वार्थी, दुष्ट, क्रूर, मद्यपी, व्यभिचारी, दुर्व्यसनी वगैरे विशेषणे लावून बदनाम करण्याचा प्रयत्न केला.*

    *सर जदुनाथ सरकार म्हणतात 'Sambhaji.. is painted in maratha history as a wicked and selfish youngman.......This story is based upon the accounts written after his death by his ministers of his father's court, all of whom he had antagonised by persecution for their attempt to disinherit him in favour of ...... Rajaram.....Thus Sambhaji's partisans have been denied a hearing at the bar of history.....but it is now possible to learn their case.....in a sanskrit poem of Paramananda'
    House of Shivaji, p. No. 195-196.

    मध्ययुगीन भारताचा इतिहास,
    पृष्ठ क्र. ५९ (युगप्रवर्तक शिवराय आणि मराठ्यांच्या शौर्यगाथा)
    प्रा. देशमुख.

    -VDC

    ReplyDelete
  98. जय #भवानी जय #शिवराय जय #शंभूराजे....वाचून खूप काही समजले

    ReplyDelete
  99. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  100. नमस्कार


    या वरून स्पष्ट झाले आहे की राज्यांचा खुन झाला आहे

    ReplyDelete
  101. या वरून स्पष्ट झाले आहे की राज्यांचा खुन झाला आहे. पण एक स्त्री स्वतःच्या पतीचा खुण करू च शकत नाही. सोयराबाई निर्दोष होत्या यात काही वाद नाही.पण शिवाजी महाराज एक थोर पुरुष होते. त्यांनी जातीभेद कधीही केलेला नाही. जे चांगले होते त्यांना जवळ केलं आणि वाईट सोबत लढाया केल्या, त्यामुळे आपल्याला त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हव्या. वाद घालून काही अर्थ नाही.

    ReplyDelete
  102. छत्रपती शिवरायांच्या राज्य अभिषेका परयंत ब्राम्हण सोबत आसावे पन शिवराय स्वताह राज्य अभिषेक करून घेनारम्हटले कि
    त्यांनी शिवरायांना विरोध सूरु केला
    कारण त्यानां सत्ता हवी होती मनुन त्यांनी असे केले
    मोरोपंत पिंगळे तर भर दरबारात शिवरायांना शुद्र म्हनतात असा उल्लेख कॉम्रेड शरद पाटील यांच्या भाषणात आहे भाषण youtube ला आहे
    रंजीत देसाई स्रिमानयोगी मधे ही असा उल्लेख आहे कि
    मोरोपंत पिंगळे नी राज्य अभिषेक होन्या अगोदर स्वतः ला नविन पोशाख शिवून घेतला होता हा
    ऱाज्याचा मंजेच त्याला
    राज्या करावे असे वाट्त होते

    ReplyDelete
  103. Please update on wikipedia

    "The question of Shivaji's heir-apparent was complicated by the misbehaviour of his eldest son Sambhaji, who was irresponsible and "addicted to sensual pleasures." Unable to curb this, Shivaji confined his son to Panhala in 1678, only to have the prince escape with his wife and defect to the Mughals for a year. Sambhaji then returned home, unrepentant, and was again confined to Panhala"


    ReplyDelete
  104. सदर ब्लॉग संपूर्ण वाचला. त्यामधील मजकुरातील मुद्दे व संदर्भ, स्पष्टीकरणे आणि युक्तिवाद काळजीपूर्वक वाचल्यानंतर प्रेरणापुरुष छ. शिवाजीमहाराज यांचा खून करण्यात आल्याची खात्री पटते. तत्कालीन सर्व लेखक एका विशिष्ट जातीचे असल्याने शिवरायांच्या खुनाबाबत एकतर्फी लेखन झाले असल्याचे मानण्यास पुरेशी जागा आहे! ब्लॉगलेखकाने अभ्यासपूर्वक व परिश्रमपूर्वक हा ब्लॉग लिहिल्याचे दिसते. त्याबद्दल त्यांना धन्यवाद ! शक्य झाल्यास या विषयावर अधिक लेखन यावे असे वाटते.- प्रदीप शिंदे

    Reply

    ReplyDelete
  105. Jay shivray............. Shivray ani shambhu maharaj ajun 10 year jivant aste tr ky zale aste asa ek block tayar kra ...plz

    ReplyDelete
  106. Jay jijau jay shivray jay shambhuraje
    Khup abhari ahot sir aplya karyala shiv shubhecha

    ReplyDelete
  107. जबरदस्तीने मुसलमान बनवले गेलेले नेताजी पालकर आणि बाबाजी निंबाळकर यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतल्याने बामणांचा तळतळाट झाला असे वाटते
    जय शिवराय

    ReplyDelete
  108. Jai jijau jai shivray jai shambhuraje
    Mahiti takil br vatl .......he bramhan
    Sale kadhi pn davpech kartay. ....
    1 da sampvavavch lagel
    Yanla...Jai maharastra..har har mahadaiv.

    ReplyDelete
  109. Jay jijau jai shivray jai shambhuraje

    ReplyDelete
  110. इथं शिवरायांच्या मृत्युविषयी ब्लॉगवर प्रतिक्रिया वाचून माझ्या बालमनाला एक शंका येते -भारतीय लष्करात स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही शिख,जाट,राजपूताना,मराठा,महार गुरखा या जातींच्या व जम्मू काश्मीर,मद्रास,कुमाॅऊ,गढवाल या प्रदेशांच्या रेजिमेंट आहेत पण ब्राम्हण/बनिया/गुजरात रेजिमेंट अद्यापपर्यंत का नाही? तरीही काहीजण शौर्याचा छातीठोक वारसा सांगताना सोयीस्कर रित्या ब्लॉग चे विषयांतर करू पाहताहेत ?

    ReplyDelete
    Replies
    1. Open main menu
      Wikipedia Search
      EditWatch this page
      1st Brahmans
      The 1st Brahmans was an infantry regiment of the British Indian Army. It was raised at Oudh by Captain T Naylor in 1776 for service in the army of Nawab Wazir of Oudh, and was known as the Nawab Wazir's Regiment. It was transferred to the East India Company in 1777. In 1922, it was designated as the 4th Battalion 1st Punjab Regiment. The regiment was disbanded in 1931.

      1st Brahmans
      Active 1903 - 22
      Country British India
      Branch Army
      Type Infantry
      Nickname(s) Neelwar ki Paltan
      Uniform Scarlet; faced white
      Engagements Second Anglo-Maratha War 1803-05
      Anglo-Nepalese War 1814-16
      First Anglo-Burmese War 1824-26
      Siege of Bhurtpore 1826
      First Afghan War 1839
      Third Anglo-Burmese War 1885-87
      First World War 1914-18
      Commanders
      Colonel of
      the Regiment Major General LHP de H Larpent
      Designations

      History Edit

      East India Company service Edit
      While in the service of the East India Company the regiment was awarded battle honours for service in the Second Maratha War 1803-05, the Anglo-Nepalese War 1814-16, the Second Anglo-Burmese War 1824-26 and the Bhurtpore Campaign 1826.

      Post Mutiny Edit
      The regiment was the senior-most among the twelve Bengal Native Infantry regiments that survived the Great Indian Rebellion of 1857-58. It was accordingly one of the small number of Bengal regular infantry regiments to retain the traditions of East India Company service in the new post-Mutiny army.[1] Renumbered as the 1st of the Bengal line, it subsequently saw active service in the Third Anglo-Burmese War of 1885-87. Following the Kitchener reforms of the Indian Army, when the names of the presidencies were dropped, the regiment became the 1st Brahman Infantry in 1901.[2]

      World War I Edit
      In 1914, the regimental centre of the 1st Brahmans was located at Allahabad and it was linked with the 3rd Brahmans. The regiment was recruited from United Provinces Brahmins, Garhwali Brahmins and some Punjabi Mussalmans. Full dress uniform of the sepoys included a high khaki turban with red fringe, a scarlet kurta (long coat) with white facings, white waist-sash, dark blue trousers and white leggings.[2]

      The regiment spent part of World War I in India before being posted to Aden, then under threat from Ottoman forces. A second battalion raised in 1917 saw service in the Persian Gulf.

      Post-war service and disbandment Edit
      After the war, a major reorganization was undertaken in the Indian Army and the various single-battalion infantry regiments were grouped together to form larger regiments of four to six battalions each. The 1st Brahmans became the 4th Battalion of the 1st Punjab Regiment in 1922. It was disbanded in 1931 due to retrenchment in the Indian Army.[2][3][4]

      See also Edit

      1st Punjab Regiment
      References

      Sources

      External links

      Last edited 7 months ago by JJMC89
      RELATED ARTICLES
      1st Punjab Regiment
      62nd Punjabis
      66th Punjabis
      Wikipedia

      Content is available under CC BY-SA 3.0 unless otherwise noted.
      Terms of UsePrivacyDesktop

      Delete
    2. Girish sir you can search regarding Brahmin regiment on Wikipedia and it will clear your mind.

      Delete
    3. Ani Brahman shauryachya gappa kadhihi marat nahit amhala kunalahi kahi dakhawnyachi garaj nahi. Amhi amcha abhiman amchya jawalach thewto. Itihas purna wachun ghyawa sir.

      Delete
  111. Sarv Mahiti Brahmandweshane bharali ahe...ani purna naahi....
    Ugaach paise gheun jati jaatit bhandane he udyog karat aahet kaahi jan... Jaat paat n mannnnara samaaj ubha raahto.....ahe.....he sahan naahi hot aahe.....yanchya dokyaat jaat aahe....ti jaat naahi....Jaudya..Hindu hinduch raahnaar..ashya kuthalyaahi jaati dweshala bali padnaar naahit.

    ReplyDelete
  112. Bajirao Peshwa hai Brahman hote he visrun chalnar nahi.baji Prabhu Deshpande he dekil Brahman hote.
    History neet vachave

    ReplyDelete
    Replies
    1. Are saglech Sarkhe nastat tase 700 Muslims pan Rajanchya sainyat hote te Swarajya sathi ladhle Tyani jat dharm nhi baghitla ani Aple Raje kontyahi jatichya ani dharmachya virodhat navte Mhanun sarv jatiche lok tyana support karat hote History madhe lihile ahe ki Afzal khana la marlya Nantar tyanchi 2 mulana pakadle hote Mavlyani pan maharajani tyana sodun dile tyanchi dushmani kontyahi jati kiwa dharma barobar navti tyanchi dushmani hoti ti Fakt Swarajya chya aad yenarya lokanshi Mg to konihi aso kontyahi jati dharma cha aso bramhan, Muslim, Maratha kontahi bhedbhav kela nhi Rajani Karan Baji ghorpada ha Maratha Jo Swarajya chya virodhat hota tyalahi Rajani marle ani ek gosht lakshat thewa Ase jati bhed karun Ethe vaad ghalnyapeksha history nit samjun ghya ani maharajanche vichar samjun ghya Nuste samjun gheu naka tar achranat aana.....

      Delete
  113. jay jajau jay shivray !! it is real story for all peoples

    ReplyDelete
  114. brahaman dweshatun lihilela lekh ahe ha marathyan madhe ani brahmnan madhe bhandane lavnya ch kam karat ahe

    ReplyDelete
  115. brahaman dweshatun lihilela lekh ahe ha marathyan madhe ani brahmnan madhe bhandane lavnya ch kam karat ahe

    ReplyDelete
  116. भांडण बंद करून सर्व जण भगव्या खाली एक व्हा.

    ReplyDelete
  117. Bajiprabhu Deshpande ,Murarbaji Deshpande aani Balaji Awaji Chitnis he tighehi CKP hote,tyancha Brahman Samajashi kahihi sambandha nahi.

    ReplyDelete
  118. एकदम बरोबर ब्लॉग !

    शरीरातुन जीव गेला तरी चालेल
    पण
    मनातुन शिवाजी महाराज जाऊ देणार नाही..

    *हातात तुझ्या पुर्वजांची राख मराठा,*
    *दिल्लीच्या तख्तालाही तुझा धाक मराठा,*
    *फोडुन डरकाळी जगाला सांग मराठा,*
    *तू एकला नव्हे..*
    *तू एक मराठा, लाख मराठा*
    ‪#‎ताकद_तुमच्या_नावात‬‪#‎आहे_राजे‬..‪#‎नाव_घेतल_की_रक्त_सळसळत‬..

    !!‪#‎‪#‎ताकद_तुमच्या_नावात‬‪#‎आहे_राजे‬..‪#‎नाव_घेतल_की_रक्त_सळसळत‬.. !!‪#‎चार_चौघात_जय_शिवराय‬‪#‎म्हणून_बघा_कोणा_कोणाला‬‪#‎मिर्ची_लागली_ते_लगेच_कळत‬..!!‪

    #‎आले_किती_गेले_किती‬‪#‎उडून_गेला_भरारा‬..‪#‎संपला_नाही_आणि‬‪#‎संपनार_ही_नाही‬..��������������‪#‎माझ्या_शिवरायाचा_दरारा‬..!!

    ��अपनी# जिंदगी का 1 वसूल है#
    #जिसको शिवबा #से प्यार नही

    वो भडवा अपना #यार नही����������
    ����जगदंब����

    ReplyDelete